शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 08:03 IST

मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीत उपोषणाला बसलेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीही उपोषणाला बसले आहेत. त्यातून मराठवाड्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. 

जालना - मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी गेल्या ५ दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरू आहे. शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी बीड, धाराशिव जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. उपोषणाच्या ५ व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली होती. त्यानंतर रात्री उशिरा वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली. जालनातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहे त्याठिकाणापासून ३ किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. अंतरवालीकडे जाणाऱ्या मार्गावरच ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू असल्याने इथं मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. 

सलाईनद्वारे रात्री पावणे दोन वाजता उपचार

५ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत शुक्रवारी ढासळली, जरांगेंमध्ये उभे राहण्याची ताकदही नव्हती. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज होती. मंत्री शंभुराज देसाई यांच्याशी फोनवरून झालेल्या संवादानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सलाईनद्वारे उपचार घेतले आहेत. शंभुराज देसाई यांनी जरांगेंना आज सलाईन घ्या, फक्त २ दिवस थांबा अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान राखून उपचार घेतोय असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

...तर चंद्र सूर्य असेपर्यंत भाजपाला वर येऊ देणार नाही

आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. राजकारणाचं बोलत नाही, उमेदवार उभं करायचा म्हणत नाही. उमेदवार पाडायचं बोलत नाही. आपली चळवळ राजकीय करायची नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचे  नाही. आता संधी दिली. आरक्षण देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे. तुम्ही आरक्षण दिले नाही तर भाजपामधला मराठाही तुमच्या बाजूने राहणार नाही. मी मराठ्यांच्या लेकरासाठी मरायला तयार आहे. मी उपचार घेणार नाही, तुम्हीही मला उपचार घ्यायला लावू नका. जर मला काही झाले तर माझा एकच शब्द लक्षात ठेवायचा कधी चंद्र, सूर्य असेपर्यंत भाजपाला वर येऊ द्यायचा नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा