शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

...तर आरक्षणाची गरजच लागणार नाही; राज ठाकरेंनी सांगितला रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 15:35 IST

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार नसतानाही अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला झोडपून काढले होते. महाराष्ट्रातला प्रचार थंडावल्याचे वाटत असतानाच राज ठाकरे यांनी पुन्हा राज्य सरकारवर शरसंधान साधले आहे. मराठा आरक्षणावरून सरकारला फसवायचच होतं, असा आरोप त्यांनी केला आहे. 

मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात जाणारच होता. आरक्षण मिळू शकत नव्हतं, यामुळे समाजाला सरकार फसवणारच होतं, एवढी वर्षे महाराष्ट्रातल्या-देशातल्या तरुणांशी खेळ करत बसलात का तुम्ही, असा सवाल विचारत त्यांनी विद्यार्थ्यांना भेटणार असल्याचे राज यांनी सांगितले. 

आरक्षण कोणत्या गोष्टींसाठी हवे आहे. शाळा-कॉलेज प्रवेश आणि नोकरीसाठीच ना, मग खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाहीच आहे. ८५ ते ९० टक्के उद्योग खासगी आहेत. मग कुठे नोकऱ्या देणार आहात असा सवाल उपस्थित करताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सगळ्यांनी मान्य केलं होतं, मग अडलं कुठे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षण मिळाल्यावर पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. 

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थानिकांना प्राधान्य देण्याचा मुद्दा मांडला. या राज्यात जेवढ्या नोकऱ्या निर्माण होताहेत किंवा शिक्षणसंस्था असतील, त्यात जर महाराष्ट्रातील मुलामुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असे ते म्हणाले. याचबरोबर महाराष्ट्राचं पोटेन्शियल पाहिलं तर महाराष्ट्र उद्योगधंद्यांमध्ये खूप पुढे आहे. अशा परिस्थितीत सिक्युरिटी, रिक्षा, टॅक्सी काहीही असू दे महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य असेल तर आरक्षणाची आवश्यकताच लागणार नाही, असे राज यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार