शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मद्य नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांवर पत्रांचा वर्षाव करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 19:42 IST

राज्य शासनाने दारुचे दुकाने उघडण्यास दिलेली परवानगी म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी

ठळक मुद्देपुणे, मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तळीरामांची तळी उचलणाऱ्या शासनाच्या सदर कृतीस प्रखर विरोध करणे आवश्यक

पुणे: कोरोना विषाणू संसर्गसारखी भयानक परिस्थिती येऊन ठेपल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हयांपैकी ३४  जिल्हे कोरोनाग्रस्त झाल्याची परिस्थिती ओढवली आहे. पुणे, मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्रादुर्भाव वाढत चालला असल्याचे दिसून येते. यादरम्यानचे काळात राज्य शासनाने दारुचे दुकाने उघडण्यास दिलेली परवानगी म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी आहे. त्यामुळे नागरिकांनी संवेदनशील मुख्यमंत्र्यांच्या हृदयाला पाझर फुटावा या आशेने आणि मद्य नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांचे ईमेल आयडीवर पत्रांचा वर्षाव करुन सदर निर्णय बदलण्यासाठी त्यांना भाग पाडावे. असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे श्रीकांत जोशी यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

जोशी यांनी सांगितले, टाळेबंदीच्या काळात तळीरामांची तळी उचलणाऱ्या शासनाच्या सदर कृतीस प्रखर विरोध करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महाराष्ट्र शासना विरोधात लेखणी युध्द सुरु करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी यापुढे त्यांना महाराष्ट्र राज्याचे पद भूषवायचे का मद्यराष्ट्राचे याचा त्वरित खुलासा करणे अपेक्षित आहे.cmo@maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपला विरोध दर्शववा आणि सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे.

* वृत्तपत्र वितरणाचा विचार का होत नाही ? 

कोरोनासारख्या महामारीचा समर्थपणे मुकाबला करीत गेला दीड महिना सर्वसामान्य जनतेने प्रशासनास व पोलीस खात्यास उत्तम सहकार्य केलेले आहे. १८ मे पर्यंत सर्वसामान्य जनता असेच सहकार्य निश्चितच करेल. तरीही प्रशासनाने लॉक डाऊन ची मुदत संपण्यापूर्वीच घाईघाईत दारूची दुकाने खुली करून सामान्य जनतेच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत. तसेच २४ तास अहोरात्र जिवाचे रान करणारे डॉक्टर व परिचारिका आणि संपूर्ण पोलीस खाते आणि सफाई कर्मचारी या सर्वांचे मानसिक खच्चीकरण केलेले आहे. वृत्तपत्र घरपोच मिळावे अशी १०० % सर्वसामान्य जनतेची मागणी आहे आणि त्यात कोणताही धोका नाही तरी त्याचा विचार होत नाही तर त्यावर बंदी,या उलट 

दारूची दुकाने उघडण्यास १०० % सर्वसामान्य जनतेचा विरोध,आणि आताच्या परिस्थितीत तर अत्यंत धोकादायक असूनही दारूची दुकाने उघडण्यास मान्यता दिली जाते कारण खरा महसूल बुडतोय तो राजकिय नेत्यांचा. व्यक्तीचे आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य आणि सामाजिक परिस्थिती यापेक्षा दारुतून मिळणारा महसूल सरकारला जास्त महत्वाचा वाटतो आहे. हे सर्वसामान्य जनतेचे दुर्देव. -विलास लेले (अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष )

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेliquor banदारूबंदीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस