शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 14:09 IST

Manoj Jarange Patil News: मराठ्यांच्या नादीच लागायचे नाही. यापुढे मराठ्यांवर अन्याय केला, तर तुमचे कार्यक्रम झालाच असे समजायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सक्रिय होऊन आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, अन्यथा समाजच त्यांना त्यांचे उत्तर देईल. मराठा समाजावर गेली सात पिढ्या अन्याय झाला आहे. गरीब मराठा समाजाची मुले शिकली पाहिजेत, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी, प्रतिष्ठा मिळावी यासाठी आरक्षणाचा लढा सुरू असून, तो अंतिम टप्प्यात पोहचला आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही, त्यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, ते स्वप्नातही आणू नका. मंत्रि‍पदाचे सोपे नाही. अजितदादांचा पूर्ण पक्षच संपेल. इतके क्रूर हत्या घडवून आणणारे, इतके गुंड सांभाळणारे, पुन्हा मंत्री केले, तर पक्ष संपेल ना. ते बंगल्यात राहिले काय आणि नाही काय, मला देणेघेणे नाही. यापुढे सांगतो की, कितीही मंत्री होऊ दे, आमचे ते दुःख नाही. ज्याच्यावर अन्याय झाला, त्याला न्याय देणे काम आहे. तुम्ही दोन काय चार मंत्री व्हा. आम्हाला फरक पडत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. काही करा. अन्याय केला की वाजवणार. सोडणारच नाही. मी आहे तोवर तरी नाही. मराठ्यांच्या नादीच लागायचे नाही. बाकीच्यांवर अन्याय तुम्ही करतच आहात. पण यापुढे मराठ्यांवर अन्याय केला, तर तुमचे कार्यक्रम झालाच असे समजायचे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत

बीडमध्ये गुन्हेगारी वाढण्यास तेथील राजकीय शक्तीच कारणीभूत असून, प्रशासनही तितकेच यामध्ये गुंतले आहे. अजितदादांकडे बीडचे पालकमंत्रिपद आहे, तरीही गुन्हेगारी थांबण्याऐवजी सुरूच आहे. यामुळे प्रशासनावर वचक नाही, हे सिद्ध होते, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. बीडचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असले तरी जोपर्यंत परळी तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी बदलले जात नाही तोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवता येणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईत २९ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन म्हणजे आरपार आणि अटीतटीची अंतिम लढाई असणार आहे. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण