शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:29 IST

Manoj Jarange Patil News: पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल, असे मराठा आरक्षण मिळवून देणार, अशी गॅरंटी देत, देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर अन्याय होतच राहणार, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत २९ ऑगस्टला आरक्षण मिळवून देणार ते पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल. आरक्षण कुणाच्या बापाची जहागिरी लागली नाही. ऑगस्टमध्ये मुंबई लाखो मराठा बांधवांनी जमावे आरक्षण घेऊनच दाखवतो कोण देणार नाही आरक्षण आरक्षण द्यावेच लागेल, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

किल्ले रायगडवरील शिवराज्याभिषेक निमित्त मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठा समाजावर असाच अन्याय होतच राहणार. त्या माणसाला मराठा समाजाबाबत इतका द्वेष आहे, इतका आकस आहे. मराठा समाजाला वाईट वागणूक देतात. त्यामुळे देशमुख परिवाराला छत्रपती शिवरायांच्या समोर येऊन नतमस्तक व्हावे लागत आहे. अन्यथा न्याय मिळण्याची मागणी करावी लागली नसती. न्याय आणि आशीर्वाद शेवटी राजांकडून मिळतील. याचा अर्थ असा होतो की, देवेंद्र फडणवीस मराठ्यांना न्याय देणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस यांनीच डाव मांडला आहे

देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले आहे. या प्रकरणाची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावली. लोकप्रतिनिधींनी दोष देऊन उपयोग नाही. कारण हे तुम्हीच घडवून आणले. परंतु, समाज हा देशमुख कुटुंबासोबत आहे. आम्ही आहोत ना, कशी काय सूट देतात तेच पाहतो. देवेंद्र फडणवीस यांनीच डाव मांडला आहे. या प्रकरणातील अनेकांना सहआरोपी केलेले नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

दरम्यान, दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका दुजाभाव ठेवता कामा नये. सगळ्या जनतेचे जर मत हे ०६ जून असेल, तर त्याच तारखेला व्हायला हवा. दोन राज्याभिषेक सोहळा करण्याचा घाट विनाकारण घालता कामा नये. समाज दूषित होईल, असे वागू नये. संस्कार हिंदू धर्माचे, राज्याचे, देशाचे सांगायचे. छत्रपती शिवरायाचे विचार सांगायचे. मग एकाच जागेवर एकत्र शिवराज्याभिषेक सोहळा का नाही करायचा. याचा अर्थ तुमची भूमिका दुटप्पी आहे. तुम्हाला दाखवायचे एक आहे आणि करायचे एक आहे. तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस