शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

“CM फडणवीसांच्या डोळ्यात पाणी आले नाही, तर सांगाल ते ऐकेन”; मनोज जरांगेनी दिले चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:29 IST

Manoj Jarange Patil News: शंभर टक्के न्याय देणार. सगळ्यांनी साथ द्यावी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil News: परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून, यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमूद आहे. पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. यावरून पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारीवरून विरोधक टीका करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणावरून आव्हान दिले आहे. 

अलीकडेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. महादेव मुंडे खून प्रकरणाची सविस्तर माहिती पत्नी ज्ञानेश्वरी व सतीश फड यांनी जरांगे पाटलांना दिली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना महादेव मुंडे कुटुंबीयांना तात्काळ वेळ द्यावी आणि या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी मान्य केली. तसेच, आरोपींना अटक करावे, अन्यथा केवळ बीड जिल्हाच नव्हे, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला. यानंतर आता पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की...

त्या मायमाऊलीला शंभर टक्के न्याय देणार. सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन करतो. एकदा तुम्ही फोटो पाहावेत. महाष्ट्रातील अठरा पगड जातीच्या लोकांना सांगतो, विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो. तुमचा भाऊ असता, तर तुम्ही फक्त फोटो पाहून दाखवा. फडणवीस यांना एकच आव्हान आहे की, कसा न्याय घ्यायचा ते आमचे आम्ही बघू. पण, मीडियासमोर येऊन तुम्ही सांगा की, ते फोटो पूर्ण पाहिले. महादेव भैय्या मुंडेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त फोटो बघावा. त्यांच्या डोळ्यात पाणी आले नाही, असे जर घडले, तर तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी २७ ऑगस्टपासून करोडोंच्या संख्येने मराठा मुंबईवर धडकणार असून, आरक्षण घेऊनच मी आणि मराठा बांधव परत येतील, असे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी नुकतेच सांगितले होते. सरकारकडे दोन वर्षांपासून शांततेत मागणी करूनही आरक्षणाची अंमलबजावणी केली नसल्याने मुंबईला येण्याची वेळ सरकारने आणली आहे. मुंबईत जागा पुरणार नाही एवढे मराठे येतील व मराठा बांधव आरक्षण आणि विजय घेऊनच परत येणार, चर्चेचा मार्ग आता नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. २७ ऑगस्टपासून अंतरवाली ते पैठण मार्गे शेवगाववरून अहिल्यानगर, आळेफाटा मार्गे जुन्नर शिवनेरी येथे नतमस्तक होऊन माळशेज घाटातून कल्याण चेंबूरमार्गे मुंबईला जाणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeed policeबीड पोलीस