शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:31 IST

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप ट्विट करून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणातील मल्लिकार्जुन पुजारी यांनी समोर येऊन मोठा दावा केला आहे. 

मुंबई - बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात ते एका पीडितेला तिला मरायचं असेल तर मरू दे, तू मध्ये पडू नकोस असं ते एका कार्यकर्त्याला सांगताना दिसतात. ती क्लिप सोशल मीडियात फिरत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटवरून ऑडिओ पोस्ट करत आव्हाडांवर टीका केली. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे माझा आवाज काढू शकतात असा आरोप केला होता. मात्र आता त्या ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारी या व्यक्तीने समोर येऊन झालेली घटना सांगत चौकशीची मागणी केली आहे. 

मल्लिकार्जुन पुजारी म्हणाले की, २ वर्षाआधी एक घटना घडली होती. एक पीडित महिला माझ्याकडे आली आणि मला न्याय मिळवून देण्यासाठी मदतीची विनंती केली. बलाढ्य, पैसेवाल्या माणसाने माझा शारिरीक छळ केला असून मला कुणी मदत करत नाही तुम्ही मदत करा असं मला बोलली. त्यानंतर मी संबंधित महिलेचं ऐकून घेतले. त्यांच्याकडील पुरावे बघितले. त्यानंतर अंधेरीतल्या डी.एन नगर पोलीस ठाण्यात एका बड्या मुझ्यिक कंपनीच्या मालकावर ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांना सर्व घटना सांगून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती असं त्यांनी माहिती दिली. 

पण त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण ताकदीने आरोपीला वाचवण्यासाठी, त्यांची राजकीय शक्ती पणाला लावून आरोपीला वाचवले. त्यानंतर पीडित महिलेला आरोपीसमोर नतमस्तक होण्यास आव्हाडांनी भाग पाडले. हेच आव्हाड बदलापूरात जाऊन, पुण्यात जाऊन काय बोलतोय, वाह रे आव्हाड. संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले तेव्हा त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, कोण तो ब्लॅकमेलर होता. ब्लॅकमेलिंग करत होता असा आरोप करतात. परंतु हे प्रकरण २ वर्षापूर्वीचे आहे. आमच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायला आम्ही रस्त्यावर पडलोय काय? या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशी करावी. जर मी पैसे घेतले असतील तर ते बाहेर पडेल अन्यथा ज्या बलाढ्य आरोपीला वाचवण्यासाठी आव्हाडांनी तडजोड केली. आर्थिक देवाणघेवाण केली तेही बाहेर पडेल अशी मागणी मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने ही मुलाखत प्रसारित केली. 

दरम्यान, बदलापूर प्रकरणी आरोपीला अटक झाली, परंतु तुमचं सरकार असताना त्या आरोपीला अटक का केली नाही? याचे उत्तर महिलांना द्या. आज राष्ट्रवादीवाले शपथा खातायेत परंतु तेव्हा तुमची आपुलकी कुठे गेली होती. माझ्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायचे असेल तर ते सिद्ध करून दाखव. आरोपीची, तुझी आणि माझीही नार्को टेस्ट करावी. सगळं समोर येऊ दे. एका मुलीला मदत करण्यासाठी माझ्या कुटुंबाला आणि मला किती त्रास झालाय हे आम्हाला माहिती आहे. संदीप देशपांडेंना मी धन्यवाद देतो, हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो असं मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस