शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'त्या' कथित ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारींचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 12:31 IST

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप ट्विट करून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणातील मल्लिकार्जुन पुजारी यांनी समोर येऊन मोठा दावा केला आहे. 

मुंबई - बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात ते एका पीडितेला तिला मरायचं असेल तर मरू दे, तू मध्ये पडू नकोस असं ते एका कार्यकर्त्याला सांगताना दिसतात. ती क्लिप सोशल मीडियात फिरत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटवरून ऑडिओ पोस्ट करत आव्हाडांवर टीका केली. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे माझा आवाज काढू शकतात असा आरोप केला होता. मात्र आता त्या ऑडिओ क्लिपमधील मल्लिकार्जुन पुजारी या व्यक्तीने समोर येऊन झालेली घटना सांगत चौकशीची मागणी केली आहे. 

मल्लिकार्जुन पुजारी म्हणाले की, २ वर्षाआधी एक घटना घडली होती. एक पीडित महिला माझ्याकडे आली आणि मला न्याय मिळवून देण्यासाठी मदतीची विनंती केली. बलाढ्य, पैसेवाल्या माणसाने माझा शारिरीक छळ केला असून मला कुणी मदत करत नाही तुम्ही मदत करा असं मला बोलली. त्यानंतर मी संबंधित महिलेचं ऐकून घेतले. त्यांच्याकडील पुरावे बघितले. त्यानंतर अंधेरीतल्या डी.एन नगर पोलीस ठाण्यात एका बड्या मुझ्यिक कंपनीच्या मालकावर ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांना सर्व घटना सांगून आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती असं त्यांनी माहिती दिली. 

पण त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण ताकदीने आरोपीला वाचवण्यासाठी, त्यांची राजकीय शक्ती पणाला लावून आरोपीला वाचवले. त्यानंतर पीडित महिलेला आरोपीसमोर नतमस्तक होण्यास आव्हाडांनी भाग पाडले. हेच आव्हाड बदलापूरात जाऊन, पुण्यात जाऊन काय बोलतोय, वाह रे आव्हाड. संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले तेव्हा त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले, कोण तो ब्लॅकमेलर होता. ब्लॅकमेलिंग करत होता असा आरोप करतात. परंतु हे प्रकरण २ वर्षापूर्वीचे आहे. आमच्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायला आम्ही रस्त्यावर पडलोय काय? या प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशी करावी. जर मी पैसे घेतले असतील तर ते बाहेर पडेल अन्यथा ज्या बलाढ्य आरोपीला वाचवण्यासाठी आव्हाडांनी तडजोड केली. आर्थिक देवाणघेवाण केली तेही बाहेर पडेल अशी मागणी मल्लिकार्जुन पुजारी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने ही मुलाखत प्रसारित केली. 

दरम्यान, बदलापूर प्रकरणी आरोपीला अटक झाली, परंतु तुमचं सरकार असताना त्या आरोपीला अटक का केली नाही? याचे उत्तर महिलांना द्या. आज राष्ट्रवादीवाले शपथा खातायेत परंतु तेव्हा तुमची आपुलकी कुठे गेली होती. माझ्यावर ब्लॅकमेलिंगचे आरोप करायचे असेल तर ते सिद्ध करून दाखव. आरोपीची, तुझी आणि माझीही नार्को टेस्ट करावी. सगळं समोर येऊ दे. एका मुलीला मदत करण्यासाठी माझ्या कुटुंबाला आणि मला किती त्रास झालाय हे आम्हाला माहिती आहे. संदीप देशपांडेंना मी धन्यवाद देतो, हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करतो असं मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस