शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

दहा वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य

By admin | Updated: January 7, 2015 02:20 IST

भारताने मंगळ यान मोहीम पहिल्याच प्रयत्नात सफल केली आहे. आपला देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वळत असून, पुढील १० वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य आहे.

मुंबई : भारताने मंगळ यान मोहीम पहिल्याच प्रयत्नात सफल केली आहे. आपला देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वळत असून, पुढील १० वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य आहे. हे प्रत्यक्षात आल्यास जपानसह अमेरिकाही भारताकडून उत्पादने आयात करेल, असा विश्वास संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मेक इन इंडिया या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. रवी पंडित, प्रमोद चौधरी यात सहभागी झाले होते.भारतातील बहुतांश कंपन्या स्वार्थी भावनेने काम करतात. भारतातील कंपन्यांनीही सिंगापूर, कोरियाप्रमाणे एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असेही भटकर म्हणाले. स्वतंत्र झालो तेव्हा आपल्याकडे गरिबी, रोजगार या समस्या होत्या. ६0 वर्षांनंतरही या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. लायसन्स राज नष्ट करून राजीव गांधी यांनी भारतात संगणकाची बिजे रोवली. त्यामुळे सॉफ्टवेअर जगतात भारताची ओळख असल्याचे भटकर यांनी या वेळी नमूद केले. जगात सर्वांत मोठ्या पायाभूत सुविधा भारतात आहेत. संशोधन आणि विकास हे भारताचे माहेरघर आहे. मेक इन इंडिया करणे भारतापुढे आव्हान असल्याचे ते म्हणाले. केएचआयटी कंपनीचे प्रमुख रवी पंडित यांनी मेक इन इंडिया होण्यासाठी देशापुढे रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण याचे प्रमुख आव्हान असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये विद्वान होण्यासाठी इतिहासातील विज्ञानाचे धडे घेणे हाच सर्वांत चांगला पर्याय असल्याचे मत भटकर यांनी या परिसंवादात व्यक्त केले.नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे वेळोवेळी माहिती देण्याचे उद्दिष्ट - मेहरामुंबई - देशाची आर्थिक घडी बसविता यावी आणि समाजाकडून या आर्थिक रचनेला पूरक असा पाठिंबा मिळावा यादृष्टीने वेळोवेळी उपयुक्त माहिती पुरविण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशन या संघटनेचे प्रमुख अजय मेहरा यांनी सांगितले. इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये परिसंवादामध्ये ते बोलत होते. या वेळी मेहरा यांनी कृषीविषयक माहितीचे वापरकर्ते, राष्ट्रीय सांख्यिकी पद्धतीचे मूल्यांकन, सांख्यिकीसंदर्भातील विधेयके, पार्श्वभूमी आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशनच्या वाटचालीतील मैलाचे दगड ठरतील, अशा गोष्टींची सविस्तर मांडणी केली. कृषीविषयक तसेच अन्य क्षेत्रांविषयीचा गाभा ठरतील अशा महत्त्वाच्या गोष्टी ही संस्था निश्चित करते, असेही ते म्हणाले.