शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

दहा वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य

By admin | Updated: January 7, 2015 02:20 IST

भारताने मंगळ यान मोहीम पहिल्याच प्रयत्नात सफल केली आहे. आपला देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वळत असून, पुढील १० वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य आहे.

मुंबई : भारताने मंगळ यान मोहीम पहिल्याच प्रयत्नात सफल केली आहे. आपला देश प्रगतीच्या मार्गावर वेगाने वळत असून, पुढील १० वर्षांत ‘मेक इन इंडिया’ शक्य आहे. हे प्रत्यक्षात आल्यास जपानसह अमेरिकाही भारताकडून उत्पादने आयात करेल, असा विश्वास संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मेक इन इंडिया या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. रवी पंडित, प्रमोद चौधरी यात सहभागी झाले होते.भारतातील बहुतांश कंपन्या स्वार्थी भावनेने काम करतात. भारतातील कंपन्यांनीही सिंगापूर, कोरियाप्रमाणे एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असेही भटकर म्हणाले. स्वतंत्र झालो तेव्हा आपल्याकडे गरिबी, रोजगार या समस्या होत्या. ६0 वर्षांनंतरही या परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. लायसन्स राज नष्ट करून राजीव गांधी यांनी भारतात संगणकाची बिजे रोवली. त्यामुळे सॉफ्टवेअर जगतात भारताची ओळख असल्याचे भटकर यांनी या वेळी नमूद केले. जगात सर्वांत मोठ्या पायाभूत सुविधा भारतात आहेत. संशोधन आणि विकास हे भारताचे माहेरघर आहे. मेक इन इंडिया करणे भारतापुढे आव्हान असल्याचे ते म्हणाले. केएचआयटी कंपनीचे प्रमुख रवी पंडित यांनी मेक इन इंडिया होण्यासाठी देशापुढे रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण याचे प्रमुख आव्हान असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये विद्वान होण्यासाठी इतिहासातील विज्ञानाचे धडे घेणे हाच सर्वांत चांगला पर्याय असल्याचे मत भटकर यांनी या परिसंवादात व्यक्त केले.नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे वेळोवेळी माहिती देण्याचे उद्दिष्ट - मेहरामुंबई - देशाची आर्थिक घडी बसविता यावी आणि समाजाकडून या आर्थिक रचनेला पूरक असा पाठिंबा मिळावा यादृष्टीने वेळोवेळी उपयुक्त माहिती पुरविण्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशन या संघटनेचे प्रमुख अजय मेहरा यांनी सांगितले. इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये परिसंवादामध्ये ते बोलत होते. या वेळी मेहरा यांनी कृषीविषयक माहितीचे वापरकर्ते, राष्ट्रीय सांख्यिकी पद्धतीचे मूल्यांकन, सांख्यिकीसंदर्भातील विधेयके, पार्श्वभूमी आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशनच्या वाटचालीतील मैलाचे दगड ठरतील, अशा गोष्टींची सविस्तर मांडणी केली. कृषीविषयक तसेच अन्य क्षेत्रांविषयीचा गाभा ठरतील अशा महत्त्वाच्या गोष्टी ही संस्था निश्चित करते, असेही ते म्हणाले.