शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नको

By admin | Updated: March 11, 2015 02:29 IST

दमणगंगा-पिंजाळ लिंक व पार-तापी-नर्मदा लिंक या दोन नद्या जोड प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : दमणगंगा-पिंजाळ लिंक व पार-तापी-नर्मदा लिंक या दोन नद्या जोड प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाविरोधात जलचिंतन संस्थेने मंगळवारपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाने उपोषणास पाठिंबा देत २० मार्चपासून जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून ३६ टीएमसी आणि पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून ३० टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही लिंक प्रकल्पास राज्य सरकारने सहमती देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी ७ जानेवारीला मुंबईत एक बैठक घेतली होती. त्यानंतर १६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे पाणी गुजरातला देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या दोन्ही प्रकल्पांमुळे जितका गुजरातला जितका फायदा होईल तितकाच महाराष्ट्राला तोटा होणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे. सध्या गुजरातची सिंचन क्षमता ४५ टक्क्यांवर पोहोचली असून, राज्याची सिंचन क्षमता केवळ १८ टक्के इतकी आहे. अशा परिस्थितीत राज्याला या पाण्याची अधिक गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पार-तापी-नर्मदा प्रकल्पामुळे कारण कसमादे परिसर, गिरणा धरणावर अवलंबून असलेला जळगाव जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, मनमाड, नांदगाव या दुष्काळी भागाला पाणी मिळणार नाही, शिवाय गोदावरी खोरे हे तुटीचे आहे. दमणगंगा-गोदावरी लिंक प्रकल्प राबवला तर नाशिक, नगर, मराठवाडा हे पाणीयुद्ध थांबेल. तर दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प राबवल्यास दमणगंगेवरच्या शिल्लक पाण्यावरील राज्याचा हक्क गमवावा लागेल. त्यामुळे राज्याला या खोऱ्यात एखादा प्रकल्प राबवायचा असेल, तर केंद्रीय जल आयोगाच्या परवानगीवर अवलंंबून राहावे लागेल. शेकापचे आमदार जयंत पाटील, धैर्यशील पाटील आणि पंडित पाटील यांनी पाठिंबा दिला. राज्यात जनआंदोलन उभारून प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)