शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय - राष्ट्रपतींकडून कौतुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 4:53 AM

स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.

मुंबई : स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागातील हागणदारीमुक्तीबाबतच्या ‘संकल्पपूर्ती’ कार्यक्रमास राष्ट्रपती कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. राष्ट्रपती आणि राज्यपालांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व संबंधित घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याबाबत राष्ट्रपतींनी राज्याचे अभिनंदन केले.महाराष्ट्राची सुमारे ४९ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे अर्धा महाराष्ट्र आज हागणदारीमुक्त झाला आहे. स्वच्छतेसाठी काम करणे ही ख-या अर्थाने मानवतेची सेवा आहे, असेही ते म्हणाले.मानसिकता बदलण्याची गरजलोकांची मानसिकता, तसेच सवयी बदलण्याची गरज आहे. त्या दृष्टीने राज्य शासनाने ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड इव्हिनिंग’ पथके स्थापन करून या कामाला पुढे नेले. राज्याने दोन वर्षांत ४० लाख शौचालयांची निर्मिती केली. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.राष्ट्रपतींचा पहिलाच मुंबई दौरापदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी पहिल्यांदाच एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. या वेळी तिन्ही सेनादलांच्या संयुक्त तुकडीने राष्ट्रपतींना सलामी दिली.मुंबईकरांचे कौतुकमुंबईत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेतील मृतांना राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली. मुंबईवासी नेहमीच आव्हानांचा सामना करीत पुढे जात असतात, या शब्दांत त्यांनी मुंबईकरांचे कौतुक केले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद