शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:27 IST

तीन पक्षांच्या सरकारवर फडणवीसांचं माऊलींच्या शब्दांत टीकास्त्र 

नागपूर: संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भारुडाचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी ज्ञानेश्वरांचं भारुड वाचून दाखवलं. तीन जणांची उडणारी त्रेधातिरपीट यावर आधारित भारुड वाचत फडणवीसांनी तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. या सरकारमध्ये 'त्रिशंकू'चा नवीन अर्थ समजला. त्रिशंकू म्हणजे तीन पक्ष एकमेकांवर शंका घेणारे, असा चिमटादेखील फडणवीसांनी काढला.  राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची दिशा स्पष्ट होत नाही. भिन्न विचारधारेचे पक्ष भविष्यात कसं सरकार चालवणार हे त्यातून दिसून येतं, असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या. जनादेश आमच्या बाजूनं आहे. हे राजकीय स्वार्थानं तयार झालेलं सरकार आहे. ते जनतेच्या मनातलं सरकार नाही, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आदरपूर्वक उल्लेख करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही कुठेही असलो आणि ते कुठेही असले तरी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवताच्या ठिकाणीच राहतील. पण, बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीनं करण्याचा दिला होता का?, असा प्रश्न फडणवीसांनी विचारला.  राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्वज्ञान उभं करण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळावा. आश्वासनं स्वत:च्या भरवशावर द्यायची असतात आणि स्वत:च्याच भरवशावर पाळायची असतात, असा टोला फडणवीसांनी लगावला. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादीनं फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका केली होती. त्या टीकेलादेखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही, असं सांगून 'कव्हर फायरिंग'चा प्रयत्न होत आहे. आमच्या सरकारनं घेतलेल्या सर्व निर्णयांमध्ये शिवसेना सोबत होती. आता ते चूक होते, हे शिवसेनेकडून वदवून घेण्याचं काम काँग्रेस-राष्ट्रवादी करणार आहे, असं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं. राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. सर्व निकषांमध्ये राज्याची आर्थिक स्थिती आता अधिक चांगली आहे आणि हे मी नाही, तर राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो, असंदखील त्यांनी स्पष्ट केलं.  ठाकरे सरकारचा उल्लेख 'स्थगिती सरकार' असा करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. ग्रामविकासच्या कामांना स्थगिती, नगरविकासच्या कामांना स्थगिती, तीर्थक्षेत्रांच्या कामांना स्थगिती. प्रत्येक कामाला स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. 'स्थगिती सरकार' अशी प्रतिमा होणं धोकादायक आहे. त्यामुळे तत्काळ कामं सुरू झाली पाहिजेत, अशी मागणी फडणवीसांनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे