शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

महाराष्ट्र निवडणूक 2019: इतका आटापिटा का...?; मुख्यमंत्रिपद न सोडणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा 'रोखठोक' सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 9:33 AM

Maharashtra Election Result 2019: शिवसेना, भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरुन 'सामना'

मुंबई: सत्तापदांच्या समान वाटपाची मागणी करत मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचा सूर काल काहीसा नरमला. मात्र आज लगचेच 'सामना'मधून शिवसेनेनं भाजपाला लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेची आणि ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. मुख्यमंत्रिपदाबद्दल शिवसेनेला कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'सामना'मधून टोला लगावण्यात आला आहे.सत्तापदांचं समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला आणि तो सहमतीनं वापरला. आता एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे 'सत्तापदा'त येत नाही असं कुणाचं म्हणणं असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्यानं लिहावे लागतील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री हे सत्तापद नाही आणि त्याचं समान वाटप करता येणं शक्य नसेल असं कुणाला वाटत असेल तर त्या बिन 'सत्ते'च्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. आम्ही शब्दाला जागतो असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा 'पेच' पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर 'पेच' का पडावा? जे ठरले आहे त्यासाठी साक्षीपुराव्यांची गरज नाही, पण सध्या धर्मग्रंथावर हात ठेवून लोक शपथेवर खोटे बोलतात असा जमाना आहे. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. शिवसेनाप्रमुखांकडून हा संस्कार आम्ही घेतला आहे,' असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा