शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!

By वसंत भोसले | Updated: November 19, 2024 08:47 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिसाद मिळतो म्हणून भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांनाच हाताशी धरून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने शिरकाव करणे सुरू केले. नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व आल्यावर कमकुवत झालेल्या काँग्रेसचे कंबरडेच मोडले.

वसंत भोसले,कोल्हापूर Maharashtra Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक दशके भरभक्कम प्रभाव राखून असलेल्या पश्चिम महाराष्ट्राने चौफेर प्रगती केली. सातत्याने सत्तेवर येणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सरकारी धोरणांचा पुरेपूर लाभ उठवित यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक नेत्यांनी योगदान दिले. परिणामी आता ५८ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस विचाराचा अपराजित प्रभाव अद्यापि आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती काही ठिकाणांचा अपवाद सोडता पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेतृत्वाच्या भरवशांवर  आव्हान निर्माण केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रावर काँग्रेस विचारांचा पगडा स्वातंत्र्यलढ्यापासूनच होता. शिवाय डाव्या विचारांकडे झुकलेल्या प्रतिसरकारच्या लढ्यानेही डावे पक्ष जनसामान्यांचा जनाधार मिळविण्यात यश मिळविले होते. शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचाराने चालणारे राजकारण सर्वव्यापी होते. शिवाय सत्यशोधकी चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजात मोठी जागृती झाली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला यशवंतराव चव्हाण, तुलसीदास जाधव, वसंतदादा पाटील, रत्नाप्पाण्णा कुंभार, काकासाहेब गाडगीळ, आदी नेत्यांचे नेतृत्व लाभले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून महाराष्ट्राची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व आले. महाराष्ट्राच्या विकासाची नियोजनबद्ध आखणी करण्यात त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या बहुजन समाजातील अनेक शिक्षित तरुणांना त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची उभारणी करावयास भागीदारी करण्याचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील पर्यायी विरोधी पक्ष ठरणारा शेतकरी कामगार पक्ष कमकुवत झाला.

सुमारे तीन दशके काँग्रेसच्या सत्तेला आव्हान देणारा पक्षच उभा राहू शकला नाही. मात्र, निवडक विरोधक असलेतरी ते तडाखेबंद भूमिका मांडणारी मंडळी होती. गणपतराव देशमुख, एन. डी. पाटील, दि. बा. पाटील ते उद्धवराव पाटील, केशव धोंगडे-पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देताना चुकांवर नेमकेपणाने बोट ठेवले. १९९० नंतर वातावरण बदलत गेले. सहकारी चळवळीने गैरव्यवहाराने टोक गाठले काँग्रेसची बदनामी होऊ लागली.

औद्योगिकरणाबरोबर तयार झालेल्या मध्यमवर्ग, त्यांच्या आशा-आकांक्षा वाढल्या. दरम्यान, शेतीतील कुंठीत अवस्था आणि दर्जेदार शिक्षणाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका काँग्रेसला बसू लागला. अनेक वर्षे भाकरी न परतल्याने नव्या नेतृत्वाला संधीच मिळेना. घराणेशाहीची सुरुवात झाली. काँग्रेस अडचणीत आली आणि गटबाजीनेही पोखरली.

दरम्यान, हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिसाद मिळतो म्हणून भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांनाच हाताशी धरून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने शिरकाव करणे सुरू केले. नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व आल्यावर कमकुवत झालेल्या काँग्रेसचे कंबरडेच मोडले. तरीदेखील आजही पुण्यातील काही जागा किंवा सांगलीची एकमेव जागा वगळली तर भाजप-मित्रपक्षांना पूर्वाश्रमीच्या काँग्रेसी नेतृत्वाच्या घराण्यांवर अवलंबून राहावे लागते आहे. अद्यापही काँग्रेस विचारांचा पगडा आहे.

या मतदारसंघात बंडखोरी 

१) इचलकरंजीत भाजप उमेदवार राहुल आवाडे यांच्याविरोधात अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे यांची बंडखोरी.

२) सांगलीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्याविरुद्ध जयश्री पाटील यांची बंडखोरी.

३) पाटणमध्ये उद्धवसेनेचे हर्षल कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांची बंडखोरी.

राजकारणाचा रंग बदल

स्वातंत्र्यलढ्यात पुणे आणि सातारा, सोलापूरचा झंझावात. काँग्रेसची खोल मुळे रुतण्यास स्वातंत्र्यसेनानींचे नेतृत्व कारणी होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काँग्रेसवर प्रतिकूल परिणाम पण यशवंतराव चव्हाण यांच्या बेरजेच्या राजकारणाने सारा बहुजन समाज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भरभक्कम.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी चळवळीच्या माध्यमातून संस्थात्मक काम झाले. या संस्थांवर काँग्रेसचे नेतृत्व राहिले.

१९७७ नंतर काँग्रेसअंतर्गत दुफळीने काँग्रेसच्या फळीस धक्के बसले. यशवंतराव चव्हाण विरुद्ध वसंतदादा विरुद्ध  शरद पवार यांच्या लढाईने काँग्रेसअंतर्गत उभ्या भेगा पडल्या.

काँग्रेसच्या प्रभावामुळ‌े महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा अपवादवगळता यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व शरद पवार यांनी अनेकवेळा महाराष्ट्राचे नेतृत्व केले.

काँग्रेसअंतर्गत संघर्ष वाढला मात्र, भाजप-शिवसेना युतीला त्याचा लाभ उठविता आला नाही. काँग्रेसच्या बंडखोरांनीच युती सरकार आल्यावर लाभ घेऊन भाजप-सेनेला पायघड्या घातल्या.

एकविसावे शतक सुरू झाले. सहकार क्षेत्र शेतकऱ्यांचे हित सांभाळण्यात कमी पडू लागले तसे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाने उचल खाल्ली, परिणाम काँग्रेसविरोधी वातावरण तयार झाले.

काँग्रेसविरोधी वातावरण, हिंदुत्वाचे राजकारण, काँग्रेसची यावर बोटचेपी भूमिका आदींचा परिणाम झाला. २०१४ मध्ये केंद्रात भाजपला बहुमत मिळताच बंडखोर काँग्रेसवाल्यांची रसद युतीला मिळू लागली.

भाजप-सेना युतीला आजही पूर्वाश्रमीच्या काँग्रेसवाल्यांचा आधार घ्यावा लागतो. तेच आज महाआघाडी विरुद्ध आव्हान उभे करीत आहे. अपवाद पुणे शहराचा होऊ शकतो.

असे लढत आहेत राजकीय पक्ष

महाविकास आघाडी 

- काँग्रेस    १६- शरद पवार गट    ३१- उध्दवसेना    १०- मित्रपक्ष    ०१

महायुती 

- भाजप    २६- अजित पवार गट    १०- शिंदे सेना    २०- मित्रपक्ष    ०२

महाविकास आघाडी अनुकूल बाबी

- लोकसभा निवडणुकीतील यशामुळे उभारी.- लोकसभा निवडणुकीत मराठा, दलित, मुस्लिम मतांचे ऐक्य.- शरद पवार यांच्या यशामुळे नवी फेरमांडणी.- शेतकरी वर्गात नाराजी.

महाविकास आघाडी प्रतिकूल बाबी 

- आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव.

- आक्रमक भूमिका घेऊन प्रचार करण्यात मागे.

- काटाजोड लढतीमुळे अनेक नेते स्थानिक प्रचारात.

- पक्षातील गटबाजी, कुरघोड्या.

महायुती अनुकूल बाबी

- प्रचारात आक्रमकता, अनेक नेत्यांच्या सभा.

- राज्यात सरकार असल्याचा प्रभाव.

- अनेक योजना जाहीर, त्यांचा प्रचार.

- लाडकी बहीण योजनेचा लाभ- प्रभावी प्रचार.

महायुती प्रतिकूल बाबी  

- शेतमालाच्या दरावरून शेतकरीवर्ग नाराज.

- मराठा समाज-मराठा आरक्षणावरून नाराजी.

- शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यास नकार.

- महापूर आणि अतिवृष्टीने नुकसान भरपाई नाही.

भाजपची काट्याची टक्कर

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावरील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचा प्रभाव मोडून काढण्यासाठी भाजप मित्र पक्षांच्या सहाय्याने प्रयत्न करीत आहे. महाविकास आघाडीने लोकसभेला दहापैकी सहा जागा जिंकल्या. पवार यांच्या प्रभावानेच हे यश मिळाले. त्याला काँग्रेसची साथ मिळाली. पुन्हा एकदा हीच लढत होत आहे. महायुतीने विशेषत: भाजपने प्रत्येक जिल्ह्यात काटा टक्कर होईल, असे वातावरण निर्माण केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील लढतींचा लक्ष्यवेध

बारामतीमध्ये शरद पवार कुटुंबीयांची सत्त्व परीक्षा. लोकसभेला ‘ताई’ आणि विधानसभेला ‘दादा’ असा निर्णय बारामतीकर घेणार का?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे. भाजपचे अतुल भोसले यांचे पुन्हा एकदा आव्हान आहे !

आर. आर. आबांमुळे तासगावचे नाव सर्वमुखी झाले तेथे त्यांचा चिरंजीव रोहित याला आबांच्या विरोधात अयशस्वी लढती केलेल्या संजयकाका पाटील यांची झुंज !

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागा घेऊन महाआघाडी भक्कम करणारे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचा कस लागणार !

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस