शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Vidhan Sabha 2019 : अपराजित राहिलेले राज्यातील अभेद्य बालेकिल्ले, यंदा काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 6:08 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे.

- असिफ कुरणेकोल्हापूर : राजकीय पटलावर कोणाची हवा, लाट असो पण राज्यात असे काही मतदारसंघ अर्थात बालेकिल्ले आहेत की तेथील नेत्यांना हरविणे महाकठीण आहे. अनेक राजकीय उलथापालथीत देखील या महारथींनी आपले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून हे नेते आपल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आहेत. सत्तेत असो की विरोधात येथील जनतेने देखील आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवत त्यांना विधानसभा सभागृहात पाठविले आहे. राज्यातील असेच काही अभेद्य मतदारसंघ व तेथील आमदारांचा आढावा.गणपतराव देशमुख (सांगोला) :सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून तब्बल ११ वेळा विजय मिळविला आहे. १९७८ व १९९९ मध्ये ते मंत्री होते. ‘देशात सर्वाधिक काळ आमदार’ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यानंतर सर्वाधिक काळ करुणानिधी हे १० वेळा आमदार राहिले आहेत.शरद पवार, अजित पवार ( बारामती) :पवार कुटुंबीय व बारामती यांचे वेगळे नाते असून हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातूनशरद पवार व अजित पवार प्रत्येकी सहावेळा आमदार झाले आहेत. आता सातव्यांदा अजित पवार येथून मैदानात उतरतील. सन १९६२ मध्ये मालतीबाई शिरोळे या प्रथम येथून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर पवार कुटुंबाचेच या मतदारसंघावर वर्चस्व आहे.जीवा पांडू गावित (सुरगाणा)सुरगाणा व कळवण मतदारसंघांतून जीवा गावित सातव्यांदा आमदार झाले आहेत. १३ व्या विधानसभागृहात ते ‘सीपीआय’चे एकमेव आमदार आहेत. डाव्या पक्षांची पीछेहाट होत असताना गावित यांनी आपला डाव्यांचा गढ कायम राखण्यात यश मिळविले आहे.जयंत पाटील (वाळवा, इस्लामपूर) :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे १९९० पासून प्रतिनिधित्व करत आहेत. ते सहावेळा आमदार झाले आहेत. त्यांनी मंत्री म्हणून अर्थ, गृह, ग्रामविकास अशी खाती सांभाळली. नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला.एकनाथ खडसे (मुक्ताईनगर) :जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा गड आहे. या मतदारसंघातून खडसे सहावेळा आमदार झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघात सन १९९० मध्ये खडसे यांनी विजय मिळविला. तेव्हापासून ते येथे प्रतिनिधित्व करत आहेत.बाळासाहेब थोरात (संगमनेर) :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ त्यांचा गड आहे. या ठिकाणातून ते सातवेळा विजयी झाले असून आठव्यांदा मैदानात उतरत आहेत. बी. जे. खताळ-पाटील यांच्यानंतर थोरात हे आमदार झाले.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) :अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे प्रतिनिधीत्व करणारे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे पाचवेळा विजय मिळवला आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र शिर्डी हा मतदारसंघ ठरला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.विलासराव देशमुख (लातूर ) :लातूर येथून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाचवेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांचा १९९५ मध्ये शिवाजीराव पाटील-कव्हेकर यांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर विलासराव दोनवेळा विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर पुत्र अमित देशमुख हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.सुरूपसिंग नाईक (नवापूर )नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर हा आरक्षित मतदारसंघ सुरूपसिंग नाईक यांचा गड. येथून ते आठवेळा विजयी झाले. त्यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे. २००९ मध्ये त्यांना १७०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.आर. आर. पाटील (तासगाव) :तासगाव मतदार संघालामाजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी देशपातळीवर ओळख मिळवून दिली. सन १९९०पासून त्यांनी सहावेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर आर. आर. आबांच्या पत्नी सुमनताईपाटील या प्रतिनिधित्व करत आहेत.पतंगराव कदम(पलूस, कडेगाव ) :काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम हे येथून सहावेळा निवडून आले व दोनदा पराभूत झाले होते. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर हा त्यांचा गड मानला जातो. कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण