शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Vidhan Sabha 2019: दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाने आत्मपरीक्षण करावे, शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:21 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपा आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठीचाभाजपा आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. त्यातच जागावाटपामध्ये नमते घेण्यास शिवसेनेने नकार दिल्याने युतीची घोषणा लांबली आहे. दरम्यान, दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.  जागावाटपाबाबत दिवसेंदिवस लंबत चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ आणि 2014 प्रमाणेच यावेळीही जागावाटपाचे एकापाठोपाठ एक फॉर्म्युले समोर येत असल्याने शेवटच्या क्षणी युती तुटणार  अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला चार शब्द सुनावले. ''विधानसभेच्या जागावाटपाबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी एक फॉर्म्युला ठरवला होता. समसमान जागावाटपाचे सूत्र तेव्हा ठरले होते. त्या फॉर्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत. आता भाजपाला जर आपल्या दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे,'' असा टोला राऊत यांनी लगावला. ''हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. येथे दिलेल्या शब्दाला किंमत आहे. युतीमध्ये आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींचा काळ पाहिलाय. प्रमोद महाजन यांनाही पाहिलंय. हे तिन्ही नेते शब्दाला पक्के होते.'' असे सांगत संजय राऊत यांनी भाजपाच्या सध्याच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.

दरम्यान,  भाजपासोबत सत्तेत जाऊन आम्ही चूक केल्याचं विधान संजय राऊत यांनी काल केले होते. '2014 साली शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत होते आपण सत्तेत गेलो पाहिजे पण माझं यावर मत वेगळं होतं. आम्ही सत्तेत गेलो नसतो तर चित्र वेगळं असतं',  मागील 5 वर्ष राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता होती. सुरुवातीच्या काळात विरोधी पक्षात बसलेली शिवसेना अवघ्या 3 महिन्यात सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यासह संपूर्ण पक्ष सत्ताधारी पक्षात गेला. शिवसेनेच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत