शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:24 IST

युती मजबूत; पण बंडखोरीची धास्ती

- किरण अग्रवाल नाशिक : गेल्या निवडणूकीत भाजपाशिवसेना ‘युती’ ने प्राबल्य राखलेल्या उत्तर महाराष्ट्रात नगर व धुळे नंदुरबारसह नाशिकमध्ये बऱ्यापैकी अस्तित्व टिकवून ठेवलेल्या कॉँग्रेस- राष्ट्रवादीला यंदा पक्षांतराचे ग्रहण लागल्याने कॉँग्रेसची हालत खस्ता तर युतीला बळ लाभून गेलेले दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्या पाठोपाठ आगामी विधानसभेच्या दृष्टीने नंदुरबारमध्ये गेल्या सुमारे ५० वर्षांपासून कॉँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनीही भाजपचे कमळ हाती धरले आहे, तर पुत्री निर्मला गावित यांनी कॉँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधले आहे. नगर जिल्ह्यातील कॉँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत तर राष्टÑवादीचे वैभव पिचड भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संख्याबळात प्रत्येकी सहा जागा मिळवून गेल्यावेळी नगर जिल्ह्यात समसमान राहीलेल्या युती व आघाडीच्या बळात यंदा फरक पडला आहे. कॉँग्रेस- राष्टÑवादीची स्थिती काहीशी कमजोर झाली असून, भाजपा शिवसेना मजबूत स्थितीत आली आहे. नंदुरबार जिल्हा आजवर कॉँग्रेससाठी अनुकूल राहत आला आहे. परंतु तेथेही या पक्षात पडझड झाली आहे. शिवाय लगतच्या शहादा मधील मातब्बर नेते पी. के. अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील हे देखील भाजपात गेले आहेत. त्यामुळे या आदिवासी पट्ट्यात भाजप मजबूत बनली आहे. खान्देशात जळगावमध्ये ११ पैकी सहा जागा जिंकलेल्या भाजपची स्थिती सर्वात चांगली असली तरी, लोकसभा निवडणुकीवेळी तिकीटावरून पदाधिकाऱ्यांत जाहीरपणे झालेली मारहाण पहाता यंदा विधानसभेला त्याचे काय पडसाद उमटतात ते पहाणे औत्सुक्याचे ठरले आहे. नाशकातही शहरातील तीनही जागा भाजप राखून असला तरी यंदा उमेदवारी बदलली जाण्याचे संकेत आहेत. एकूण उत्तर महाराष्टÑात युती सध्यातरी मजबूत असली तरी ऐनवेळी होणारी बंडखोरी चित्र बदलू शकते.प्रचारात मुद्दे काय?नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात वन हक्क दाव्यांचा प्रश्न लोंबकळला आहे. त्यामुळे या परीसरात सदरचा मुद्दा प्रचारात प्रभावी ठरेल.गिरीश महाजन, जयकुमार रावल, दादा भुसे व राम शिंदे यांच्यासारखे मंत्री असताना उत्तर महाराष्टÑात नवा उद्योग किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकणारा प्रकल्प येऊ शकलेला नाही.नाशिकच्या कांद्यापासून जळगावच्या केळी पर्यंत सर्व शेतमालाच्या भावाचा प्रश्न कायम आहे. शेतकºयांच्या आत्महत्या कमी झालेल्या नसून कर्जमाफी फोल ठरल्याची भावना आहे.उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ४७भाजप-१९शिवसेना-८काँग्रेस-११राष्ट्रवादी-७इतर-२

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस