शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:24 IST

युती मजबूत; पण बंडखोरीची धास्ती

- किरण अग्रवाल नाशिक : गेल्या निवडणूकीत भाजपाशिवसेना ‘युती’ ने प्राबल्य राखलेल्या उत्तर महाराष्ट्रात नगर व धुळे नंदुरबारसह नाशिकमध्ये बऱ्यापैकी अस्तित्व टिकवून ठेवलेल्या कॉँग्रेस- राष्ट्रवादीला यंदा पक्षांतराचे ग्रहण लागल्याने कॉँग्रेसची हालत खस्ता तर युतीला बळ लाभून गेलेले दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्या पाठोपाठ आगामी विधानसभेच्या दृष्टीने नंदुरबारमध्ये गेल्या सुमारे ५० वर्षांपासून कॉँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनीही भाजपचे कमळ हाती धरले आहे, तर पुत्री निर्मला गावित यांनी कॉँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधले आहे. नगर जिल्ह्यातील कॉँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत तर राष्टÑवादीचे वैभव पिचड भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संख्याबळात प्रत्येकी सहा जागा मिळवून गेल्यावेळी नगर जिल्ह्यात समसमान राहीलेल्या युती व आघाडीच्या बळात यंदा फरक पडला आहे. कॉँग्रेस- राष्टÑवादीची स्थिती काहीशी कमजोर झाली असून, भाजपा शिवसेना मजबूत स्थितीत आली आहे. नंदुरबार जिल्हा आजवर कॉँग्रेससाठी अनुकूल राहत आला आहे. परंतु तेथेही या पक्षात पडझड झाली आहे. शिवाय लगतच्या शहादा मधील मातब्बर नेते पी. के. अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील हे देखील भाजपात गेले आहेत. त्यामुळे या आदिवासी पट्ट्यात भाजप मजबूत बनली आहे. खान्देशात जळगावमध्ये ११ पैकी सहा जागा जिंकलेल्या भाजपची स्थिती सर्वात चांगली असली तरी, लोकसभा निवडणुकीवेळी तिकीटावरून पदाधिकाऱ्यांत जाहीरपणे झालेली मारहाण पहाता यंदा विधानसभेला त्याचे काय पडसाद उमटतात ते पहाणे औत्सुक्याचे ठरले आहे. नाशकातही शहरातील तीनही जागा भाजप राखून असला तरी यंदा उमेदवारी बदलली जाण्याचे संकेत आहेत. एकूण उत्तर महाराष्टÑात युती सध्यातरी मजबूत असली तरी ऐनवेळी होणारी बंडखोरी चित्र बदलू शकते.प्रचारात मुद्दे काय?नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात वन हक्क दाव्यांचा प्रश्न लोंबकळला आहे. त्यामुळे या परीसरात सदरचा मुद्दा प्रचारात प्रभावी ठरेल.गिरीश महाजन, जयकुमार रावल, दादा भुसे व राम शिंदे यांच्यासारखे मंत्री असताना उत्तर महाराष्टÑात नवा उद्योग किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकणारा प्रकल्प येऊ शकलेला नाही.नाशिकच्या कांद्यापासून जळगावच्या केळी पर्यंत सर्व शेतमालाच्या भावाचा प्रश्न कायम आहे. शेतकºयांच्या आत्महत्या कमी झालेल्या नसून कर्जमाफी फोल ठरल्याची भावना आहे.उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ४७भाजप-१९शिवसेना-८काँग्रेस-११राष्ट्रवादी-७इतर-२

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस