शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

Vidhan Sabha 2019: पक्षांतरामुळे कॉँग्रेस खस्ता; ‘युती’त बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:24 IST

युती मजबूत; पण बंडखोरीची धास्ती

- किरण अग्रवाल नाशिक : गेल्या निवडणूकीत भाजपाशिवसेना ‘युती’ ने प्राबल्य राखलेल्या उत्तर महाराष्ट्रात नगर व धुळे नंदुरबारसह नाशिकमध्ये बऱ्यापैकी अस्तित्व टिकवून ठेवलेल्या कॉँग्रेस- राष्ट्रवादीला यंदा पक्षांतराचे ग्रहण लागल्याने कॉँग्रेसची हालत खस्ता तर युतीला बळ लाभून गेलेले दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा रस्ता धरला होता. त्या पाठोपाठ आगामी विधानसभेच्या दृष्टीने नंदुरबारमध्ये गेल्या सुमारे ५० वर्षांपासून कॉँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनीही भाजपचे कमळ हाती धरले आहे, तर पुत्री निर्मला गावित यांनी कॉँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत शिवबंधन हाती बांधले आहे. नगर जिल्ह्यातील कॉँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत तर राष्टÑवादीचे वैभव पिचड भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे संख्याबळात प्रत्येकी सहा जागा मिळवून गेल्यावेळी नगर जिल्ह्यात समसमान राहीलेल्या युती व आघाडीच्या बळात यंदा फरक पडला आहे. कॉँग्रेस- राष्टÑवादीची स्थिती काहीशी कमजोर झाली असून, भाजपा शिवसेना मजबूत स्थितीत आली आहे. नंदुरबार जिल्हा आजवर कॉँग्रेससाठी अनुकूल राहत आला आहे. परंतु तेथेही या पक्षात पडझड झाली आहे. शिवाय लगतच्या शहादा मधील मातब्बर नेते पी. के. अण्णा पाटील यांचे पुत्र दीपक पाटील हे देखील भाजपात गेले आहेत. त्यामुळे या आदिवासी पट्ट्यात भाजप मजबूत बनली आहे. खान्देशात जळगावमध्ये ११ पैकी सहा जागा जिंकलेल्या भाजपची स्थिती सर्वात चांगली असली तरी, लोकसभा निवडणुकीवेळी तिकीटावरून पदाधिकाऱ्यांत जाहीरपणे झालेली मारहाण पहाता यंदा विधानसभेला त्याचे काय पडसाद उमटतात ते पहाणे औत्सुक्याचे ठरले आहे. नाशकातही शहरातील तीनही जागा भाजप राखून असला तरी यंदा उमेदवारी बदलली जाण्याचे संकेत आहेत. एकूण उत्तर महाराष्टÑात युती सध्यातरी मजबूत असली तरी ऐनवेळी होणारी बंडखोरी चित्र बदलू शकते.प्रचारात मुद्दे काय?नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात वन हक्क दाव्यांचा प्रश्न लोंबकळला आहे. त्यामुळे या परीसरात सदरचा मुद्दा प्रचारात प्रभावी ठरेल.गिरीश महाजन, जयकुमार रावल, दादा भुसे व राम शिंदे यांच्यासारखे मंत्री असताना उत्तर महाराष्टÑात नवा उद्योग किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकणारा प्रकल्प येऊ शकलेला नाही.नाशिकच्या कांद्यापासून जळगावच्या केळी पर्यंत सर्व शेतमालाच्या भावाचा प्रश्न कायम आहे. शेतकºयांच्या आत्महत्या कमी झालेल्या नसून कर्जमाफी फोल ठरल्याची भावना आहे.उत्तर महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ४७भाजप-१९शिवसेना-८काँग्रेस-११राष्ट्रवादी-७इतर-२

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस