शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Vidhan Sabha 2019: तीन दिवसांनंतरच्या मतमोजणीवर प्रकाश आंबेडकरांना आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:09 AM

निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : एकाच दिवशी मतदान होणार आहे, याचे आम्ही स्वागत करतो; परंतु मतमोजणी तीन दिवसांनंतर होणार, यावर आमचा आक्षेप आहे. या तीन दिवसांत काहीही गडबड होऊ शकते. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करून दुसऱ्याच दिवशी मतमोजणीची मागणी करणार आहोत, अशी माहिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.ते म्हणाले, बहुजन वंचित आघाडीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना तसेच अपक्ष उमेदवारांना कोणतेही स्थान अथवा पाठिंबा नसेल. मात्र, मित्रपक्षांना आवश्यक त्याठिकाणी जागा सोडून पाठबळ दिले जाईल. राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. ती रुळावर आणण्यासाठी आम्ही योजना राबविणार आहोत. तसेच या जुमलेबाज सरकारला जनता वैतागली आहे. त्यामुळे जनतेसमोर तिसरा व चांगला पर्याय म्हणून बहुजन वंचित आघाडी पुढे आली आहे.भाजप-सेना, काँग्रेस आघाडी यांना एकजातीय स्वरूप आले असून, तेथे वंचितांना न्याय नाही. आम्ही भाजपची बी टीम असा काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या कित्येक नेत्यांवर ४२० चे गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी सौदा केल्याची टीका आंबेडकर यांनी केली.बंद खोलीत चर्चाबहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त इचलकरंजीत आले होते. त्यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंद खोलीत सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेबाबत राज्यातील राजकीय स्थितीसंदर्भात औपचारिक चर्चा झाली असल्याचे आवाडे यांनी सांगितले असले तरी मैत्रीपूर्ण लढतीसाठी भेट झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर