शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Vidhan Sabha 2019: 'राज्यात भाजपचे सरकार, फडणवीस हेच मुख्यमंत्री'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 06:45 IST

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची घोषणा; जागांवर अडलेल्या शिवसेनेला दिला इशारा

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे भाजप सरकार येणार असून, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी करत प्रचाराचे रणशिंग फुंकले. युतीचे जागावाटप आणि शिवसेनेचा नामोल्लेखही त्यांनी टाळला. त्यामुळे शहा यांचे हे भाषण शिवसेनेला इशारा असल्याचे मानले जात आहे.गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित कार्यक्रमात अमित शहा यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. ही भूमिका मांडताना राज्यात भाजपला पूर्ण बहुमताने निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. शहा यांनी आपल्या ३४ मिनिटांच्या या भाषणात शिवसेनेचे नावही घेतले नाही.निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी होणाºया या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शहा यांच्या या दौºयातच युतीची घोषणा होणार, शहा मातोश्रीवर जाणार, अशी चर्चा होती, परंतु आपल्या पाऊण तासाच्या भाषणात शहा यांनी जागावाटप आणि शिवसेनेबाबत चकार शब्दही काढला नाही. उलट राज्यात भाजप पूर्ण बहुमताचे सरकार बनवेल आणि देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे ठणकावून सांगितले.काश्मीरमध्ये ३७० कलम लागू केल्यापासून या कलमामुळे ४० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरातून आता दहशतवाद हद्दपार होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडणारे शरद पवार यांनी हे कान उघडून ऐकावे असा टोलाही त्यांनी लगावला. कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुम्ही विरोध करता की समर्थन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकांना स्पष्ट सांगावे असे आवाहन शहा यांनी यावेळी केले.बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता. अशा मुद्यांमध्ये राजकारण आणता कामा नये. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कलम ३७० हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणले अशीही टीका शहा यांनी केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे