शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:20 IST

भाजपचे सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान

- वसंत भोसले कोल्हापूर : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वच पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे हा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गड राहिला आहे. त्यांच्या पक्षातील अनेक मोहरे लढण्यापूर्वीच भाजपला शरण गेल्याने दोन्ही कॉँग्रेस पक्ष अडचणीत सापडले आहेत.पश्चिम महाराष्ट हा सधन विभाग मानला जातो. सहकार हा येथील राजकारणाचा कणा असल्याने नेहमीच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर कॉँग्रेसची पीछेहाट झाली. गतनिवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यात राष्ट्रवादीला सोळा तर कॉँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. येत्या निवडणुकीत त्याहून वाईट स्थिती होईल, अशी शक्यता आहे.सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने केवळ तीन जागा लढवून त्या सर्व गमावल्या. पश्चिम महाराष्टÑातून कॉँग्रेसचा एकही खासदार नाही. राष्टÑवादीने छोटा गड का असेना पुणे आणि साताºयात राखला आहे. याउलट भाजपने आपली ताकद वाढविली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेससाठी सोलापूर, सातारा आणि सांगली हे जिल्हे सातत्याने दोन-चार आमदार देणारे आहेत. त्यापैकी जयंत पाटील, सुमनताई पाटील, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, मकरंद पाटील आदी समर्थक उमेदवारवगळता दमछाकच होणार आहे. हीच अवस्था काँग्रेसची आहे. भाजपला पुणे शहरातून पुन्हा कौल मिळेल; असे वातावरण आहे. जिल्ह्यातील तेरा जागांवरही या पक्षाने मातब्बर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडे तेरा आमदार आहेत, स्वतंत्रपणे लढले तरी सेना स्पर्धेत राहणार आहे. भाजप-सेना युती झाली तर मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचा टिकाव लागणे कठीण, अशी परिस्थिती तरी सध्या आहे.एमआयएमशाी फारकत घेतल्याने वंचित आघाडीचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.प्रचाराचे मुद्देमहापुराने कृष्णा आणि भीमा नदीच्या काठावर हाहाकार उडाला असला तरी पश्चिम महाराष्टÑाच्या पूर्वेकडीलच्या दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्न गंभीर आहे. तो यशस्वीपणे हाताळण्यात फडणवीस सरकारलाही यश आलेले नाही.साखर कारखाने अनेक कारणांनी अडचणीत आल्याने ऊसकरी शेतकरी संकटात आहे. त्याला मदत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले आहे, हा मुद्दा प्रचारात येऊ शकतो.मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्मा’ची मान्यता या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाला नाही, त्याची नाराजी राहणार आहे.राष्टÑवादाच्या मुद्द्यावरच मोदींसाठी मतदान करा, याच्याआधारेच भाजप-सेना प्रचारावर भर देण्याची शक्यता आहे, अन्यथा सांगण्यायोग्य काही मुद्देच नाहीत.पश्चिम महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ५८भाजप-२१शिवसेना-१३काँग्रेस-७राष्ट्रवादी-१६इतर-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस