शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:20 IST

भाजपचे सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान

- वसंत भोसले कोल्हापूर : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वच पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे हा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गड राहिला आहे. त्यांच्या पक्षातील अनेक मोहरे लढण्यापूर्वीच भाजपला शरण गेल्याने दोन्ही कॉँग्रेस पक्ष अडचणीत सापडले आहेत.पश्चिम महाराष्ट हा सधन विभाग मानला जातो. सहकार हा येथील राजकारणाचा कणा असल्याने नेहमीच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर कॉँग्रेसची पीछेहाट झाली. गतनिवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यात राष्ट्रवादीला सोळा तर कॉँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. येत्या निवडणुकीत त्याहून वाईट स्थिती होईल, अशी शक्यता आहे.सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने केवळ तीन जागा लढवून त्या सर्व गमावल्या. पश्चिम महाराष्टÑातून कॉँग्रेसचा एकही खासदार नाही. राष्टÑवादीने छोटा गड का असेना पुणे आणि साताºयात राखला आहे. याउलट भाजपने आपली ताकद वाढविली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेससाठी सोलापूर, सातारा आणि सांगली हे जिल्हे सातत्याने दोन-चार आमदार देणारे आहेत. त्यापैकी जयंत पाटील, सुमनताई पाटील, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, मकरंद पाटील आदी समर्थक उमेदवारवगळता दमछाकच होणार आहे. हीच अवस्था काँग्रेसची आहे. भाजपला पुणे शहरातून पुन्हा कौल मिळेल; असे वातावरण आहे. जिल्ह्यातील तेरा जागांवरही या पक्षाने मातब्बर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडे तेरा आमदार आहेत, स्वतंत्रपणे लढले तरी सेना स्पर्धेत राहणार आहे. भाजप-सेना युती झाली तर मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचा टिकाव लागणे कठीण, अशी परिस्थिती तरी सध्या आहे.एमआयएमशाी फारकत घेतल्याने वंचित आघाडीचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.प्रचाराचे मुद्देमहापुराने कृष्णा आणि भीमा नदीच्या काठावर हाहाकार उडाला असला तरी पश्चिम महाराष्टÑाच्या पूर्वेकडीलच्या दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्न गंभीर आहे. तो यशस्वीपणे हाताळण्यात फडणवीस सरकारलाही यश आलेले नाही.साखर कारखाने अनेक कारणांनी अडचणीत आल्याने ऊसकरी शेतकरी संकटात आहे. त्याला मदत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले आहे, हा मुद्दा प्रचारात येऊ शकतो.मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्मा’ची मान्यता या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाला नाही, त्याची नाराजी राहणार आहे.राष्टÑवादाच्या मुद्द्यावरच मोदींसाठी मतदान करा, याच्याआधारेच भाजप-सेना प्रचारावर भर देण्याची शक्यता आहे, अन्यथा सांगण्यायोग्य काही मुद्देच नाहीत.पश्चिम महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ५८भाजप-२१शिवसेना-१३काँग्रेस-७राष्ट्रवादी-१६इतर-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस