शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Vidhan Sabha 2019: पश्चिम महाराष्ट्र- बालेकिल्ल्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:20 IST

भाजपचे सर्वच पक्षांसमोर कडवे आव्हान

- वसंत भोसले कोल्हापूर : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वच पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे हा कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा गड राहिला आहे. त्यांच्या पक्षातील अनेक मोहरे लढण्यापूर्वीच भाजपला शरण गेल्याने दोन्ही कॉँग्रेस पक्ष अडचणीत सापडले आहेत.पश्चिम महाराष्ट हा सधन विभाग मानला जातो. सहकार हा येथील राजकारणाचा कणा असल्याने नेहमीच कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर कॉँग्रेसची पीछेहाट झाली. गतनिवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यात राष्ट्रवादीला सोळा तर कॉँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. येत्या निवडणुकीत त्याहून वाईट स्थिती होईल, अशी शक्यता आहे.सलग दोन्ही लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने केवळ तीन जागा लढवून त्या सर्व गमावल्या. पश्चिम महाराष्टÑातून कॉँग्रेसचा एकही खासदार नाही. राष्टÑवादीने छोटा गड का असेना पुणे आणि साताºयात राखला आहे. याउलट भाजपने आपली ताकद वाढविली आहे. राष्टÑवादी कॉँग्रेससाठी सोलापूर, सातारा आणि सांगली हे जिल्हे सातत्याने दोन-चार आमदार देणारे आहेत. त्यापैकी जयंत पाटील, सुमनताई पाटील, हसन मुश्रीफ, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, मकरंद पाटील आदी समर्थक उमेदवारवगळता दमछाकच होणार आहे. हीच अवस्था काँग्रेसची आहे. भाजपला पुणे शहरातून पुन्हा कौल मिळेल; असे वातावरण आहे. जिल्ह्यातील तेरा जागांवरही या पक्षाने मातब्बर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडे तेरा आमदार आहेत, स्वतंत्रपणे लढले तरी सेना स्पर्धेत राहणार आहे. भाजप-सेना युती झाली तर मात्र कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीचा टिकाव लागणे कठीण, अशी परिस्थिती तरी सध्या आहे.एमआयएमशाी फारकत घेतल्याने वंचित आघाडीचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.प्रचाराचे मुद्देमहापुराने कृष्णा आणि भीमा नदीच्या काठावर हाहाकार उडाला असला तरी पश्चिम महाराष्टÑाच्या पूर्वेकडीलच्या दुष्काळी पट्ट्यातील पाणीप्रश्न गंभीर आहे. तो यशस्वीपणे हाताळण्यात फडणवीस सरकारलाही यश आलेले नाही.साखर कारखाने अनेक कारणांनी अडचणीत आल्याने ऊसकरी शेतकरी संकटात आहे. त्याला मदत करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात सरकारला अपयश आले आहे, हा मुद्दा प्रचारात येऊ शकतो.मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि लिंगायत समाजाला ‘स्वतंत्र धर्मा’ची मान्यता या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाला नाही, त्याची नाराजी राहणार आहे.राष्टÑवादाच्या मुद्द्यावरच मोदींसाठी मतदान करा, याच्याआधारेच भाजप-सेना प्रचारावर भर देण्याची शक्यता आहे, अन्यथा सांगण्यायोग्य काही मुद्देच नाहीत.पश्चिम महाराष्ट्रातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ५८भाजप-२१शिवसेना-१३काँग्रेस-७राष्ट्रवादी-१६इतर-१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस