शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार

By अतुल कुलकर्णी | Published: October 03, 2019 6:46 AM

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे. काँग्रेसने समाजवादी पक्षाला भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व आणि मानखुर्द हे तीन मतदारसंघ देण्याचे मान्य केल्यामुळे अबू आझमी आघाडीत सहभागी झाले. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सीपीआयएम, सीपीआय, जनता दल यांच्या जागांबाबत वाद कायम आहे.शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पेण, उरण, पनवेल, अलिबाग व रोहा या जागी फक्त राष्ट्रवादीसोबत आघाडी व काँग्रेसने आपले उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढाई करायची, अशी अट घातली आहे. शेकापला आघाडीत सहभागी करून घेण्याची अट मान्य करण्यात आली. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ म्हणजेच २५० जागा लढवणार होते. तर ३८ जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार होत्या. मात्र मित्रपक्षांकडून मागणी कमी आली. त्यामुळे आयत्यावेळी काही मतदारसंघ बदलून घेत मित्रपक्षासह काँग्रेसने १५६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. यातील ९ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यात ३ जागा समाजवादी पक्षाला तर उर्वरित ६ जागा रिपाइं कवाडे गट आणि रिपाइं गवई गट यांना दिल्या जातील. त्यामुळे काँग्रेसकडे १४७ जागा उरतील.राष्ट्रवादी आता मित्रपक्षांसह १३२ जागा लढविणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेसह अन्य मित्रपक्षांना ८ जागा देण्यात येणार आहेत. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आघाडीसोबत अचलपूर आणि मुंबई अशा २ जागा लढेल. त्यामुळे राष्ट्रवादीकडे १२४ जागा असतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शिरोळमधून लढतील.माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीतनाशिक जिल्हयातील भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कोकाटे यांना सिन्नर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस