शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मनसेच्या बदललेल्या पवित्र्यामागे चाणक्यनीती की अदृश्य टाळी?

By संदीप प्रधान | Updated: September 23, 2019 06:47 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे.

- संदीप प्रधान मुंबई : मनसैनिकांच्या दबावापोटी म्हणा किंवा ईडीच्या धाकाने म्हणा किंवा अस्तित्वाच्या लढाईकरिता, ठाकरेबंधूंमधील प्रेमापोटी म्हणा राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उभे करण्यास तयार झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे. विधानसभेच्या २८८ जागा असून त्यापैकी केवळ १०० कोणत्या जागांवर मनसे लढणार ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच स्पष्ट होईल. त्यानंतरच मनसेच्या बदललेल्या भूमिकेमागील प्रेरणा कोण, ते स्पष्ट होईल.मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, राज यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यानंतरही अनुकूल निकाल न लागल्याने राज यांनी ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित केला. निकाल जर फिक्स असेल, तर निवडणुका कशाला लढवायच्या, असा सवाल करणाऱ्या राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्वत:कडील पैसे जपून वापरण्याचे आवाहन केले होते.राज यांच्या भाजपविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना ईडी चौकशीची नोटीस आली. त्यांचे निकटवर्तीय उन्मेष जोशी, राजन शिरोडकर व नितीन सरदेसाई यांनाही ईडीच्या कार्यालयात चकरा मारायला लागल्या. त्यावेळीच अशी चर्चा सुरू झाली होती की, सत्ताधारी भाजपने युती केली किंवा तोडली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मनसे रिंगणात हवी आहे. युती तोडल्यानंतर शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार रिंगणात असतील, तर मराठी मतांच्या विभाजनाचा लाभ भाजपच्या उमेदवारांना होऊ शकतो किंवा युती असतानाही शिवसेनेला मनसेच्या उमेदवारांमुळे झटका लागला, तर शिवसेना मागील वेळेसारखी ६३ जागांवर मजल मारणार नाही. त्यामुळे आता मनसेने शिवसेनेच्या मतदारसंघात उमेदवार दिले, तर या खेळीमागे भाजपचे चाणक्य असल्याचे स्पष्ट होईल.दुसरा तर्क असाही आहे की, राज हे निवडणूक लढवायला उत्सुक नव्हते, मात्र शिवसेनेने त्यांच्या व मनसेच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचे लक्षात आणून दिल्याने राज यांनी लढायला अनुकूलता दाखवली आहे. ठाण्यातील नौपाडा येथील बिल्डर हसमुख शहा याने अलीकडेच राहुल पैठणकर या मराठी ब्राह्मण व्यक्तीला किरकोळ कारणावरून मारहाण केली. लागलीच मनसेने या वादात उडी घेत शहाला इंगा दाखवला. सध्या दोन्ही सेनांचा मुख्य शत्रू भाजप असून त्याचे नेतृत्व दोन गुजराती व्यक्ती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहा याला इंगा दाखवण्यामागे शिवसेना व मनसे यांची आतून हातमिळवणी तर नाही ना, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस