शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचा चढता आलेख , एनसीआरबीचा अहवाल : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्याचा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:25 AM

मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग....

- मनीषा म्हात्रेमुंबई : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग, बलात्कार, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांत बालकांचा समावेश वाढत चालला आहे, ही गंभीर बाब आहे.एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात बालगुन्हेगारीचे ३५ हजार ८४९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मध्य प्रदेश अग्रस्थानी आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण ७,३६९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. राज्यात एकूण ६ हजार ६०६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये बालगुन्हेगारांकडून झालेल्या हत्येच्या आकडा १३०वर पोहोचला आहे. तर अल्पवयीन मुलांकडून २५८ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. आरोपींमध्ये १२ वर्षांखालील मुलेही आहेत, ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत ७,७१२ बालगुन्हेगारांना विविध गुन्ह्यांत ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक ते १२वी इयत्तेपर्यंत शिकणाºया बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे.अनेक बालगुन्हेगार मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने गुन्हेगारीकडे वळतात. दिवसभर सुरू असणाºया विविध वाहिन्या, गुन्हेगारी मालिका, स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा मिळणे ही मानसिकता; तसेच मित्रांची संगत, पालकांचे पुरेसे नियंत्रण नसल्याने मुले चुकीच्या मार्गाकडे वळतात. काही सराईत गुन्हेगार पैशांचे आमिष दाखवून बालकांचा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतात. घरातील आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती तसेच चुकीच्या मित्रांची साथसंगतदेखील मुलांना बालगुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून येत आहे. केवळ पैशांसाठीच नाही, तर विकृतपणे लैंगिक आकर्षणापोटी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कारवाईतील अडचणीबालगुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नोंद करून बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येते. गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. जिल्हा सत्र न्यायालयात बालगुन्हेगारांच्या जामिनासाठी अर्ज करावा लागतो.कोर्टाच्या परवानगीनंतर त्याला बालसुधारगृहात ठेवायचे अथवा जामिनावर सोडून पालकांच्या ताब्यात द्यायचे, याबाबत गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेण्यात येतो. यानंतर बालसुधारगृहातील बाल न्याय मंडळापुढे त्याची केस सुरू होते. त्यानंतर साक्षीपुरावे पाहून बाल न्याय मंडळ त्यावर निर्णय घेते.पकडलेल्या बालगुन्हेगाराला अटक करता येत नाही. त्याला कारागृहात अथवा लॉकअपमध्ये ठेवता येत नाही. खाकी वर्दीची दहशत बसू नये म्हणून साध्या वेशातील कर्मचारी चौकशीसाठी येतात. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्यायचे ठरले तर बाल न्याय मंडळाला अर्ज करावा लागतो.  शैक्षणिक वर्गीकरणानुसारशिक्षण    अटक बालगुन्हेगार    निरक्षर    ४२०प्राथमिक शिक्षण    २७६४दहावी नापास    ४१२९१२वी पास    ३९९ 

 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार