शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Coronavirus: राज्यात दिवसभरात १४ हजार ७३२ जण कोरोनामुक्त; २८ जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 9:58 PM

Coronavirus: राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे.

ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवरया जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही मुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ६७२ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8129 new corona cases and 200 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ०८ हजार १२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ४७ हजार ३५४ इतकी आहे.

मुंबईकरांना मोठा दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५२९ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७२५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २०२ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५ हजार ५५० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ६७२ दिवसांवर गेला आहे. 

या जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही 

सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील २८ जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. ठाणे जिल्हा, ठाणे शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, पालघर, वसई-विरार शहर, मालेगाव शहर, अहमदनगर शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, जळगाव शहर, पिंपरी चिंचवड शहर, सोलापूर शहर, जालना जिल्हा, परभणी शहर, लातूर शहर, लातूर जिल्हा, नांदेड शहर, अमरावती शहर, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

दिलासा! धारावीत शून्य रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८२ लाख १५ हजार ४९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख १७ हजार १२१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ९ लाख ४९ हजार २५१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ५ हजार ९९७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या