शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

Heavy Rain : रत्नागिरी जिल्ह्यात अस्मानी संकट, अनेक ठिकाणी पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 10:41 IST

चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे आला पूर. व्यापारी, शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान.

ठळक मुद्देचिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे आला पूर.व्यापारी, शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान.

रत्नागिरी - गेले दहा दिवस संततधार सुरू असलेल्या आणि बुधवारी रात्री मुसळधार कोसळलेल्या पावसाने २००५ च्या अस्मानी संकटाची आठवण करुन दिली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड येथे पूर आला आहे. चिपळूण तालुक्यात पेढे येथे दरड कोसळून तीनजण त्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

येथे कोसळत पावसामुळे अवघा परिसर जलमय झाला असून २००५ मधील महापुराची पुनरावृत्ती झाल्याप्रमाणे चित्र निर्माण झालं आहे. अनेक घरं पाण्याखाली गेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून अनेकांना पुरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच एनडीआरएफची टीम बोलावण्यात आली आहे. या पावसात तालुक्यातील पेढे-कुंभारवाडी येथे दरड कोसळून तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने कोसळणाऱ्या  पावसामुळे राजापूर शहराला सलग १४ दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाल्याने नदीकिनाऱ्यालगतच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातुन वाहणाऱ्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने नदीकिनाऱ्यालगतची अनेक गावे व वाड्या पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . अर्जुना नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून रायपाटण गांगणवाडीतील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नाटे येथील ठाकरेवाडीचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे. प्रिंदावण तारळ भागातून वाहणाऱ्या सुक नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन मळेशेती गेले १४ दिवस पाण्याखाली राहिल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. 

गेले दोन आठवडे संततधारेने लागणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला गेले १४ दिवस पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे . सातत्याने पुराच्या पाण्यात चढ उतार राहिल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्ध्याहून अधिक बाजारपेठ सातत्याने पुराच्या पाण्याखाली असल्यामुळे गेले पंधरा दिवस बाजारपेठ बंदच आहे. गेले चार महिने कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने बाजारपेठ बंद होती मात्र त्यानंतर आता पावसामुळे सुमारे १५ दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने राजापूर शहरातील व्यापारी मेटाकुटीला आले आहेत.

संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असून रामपेठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मारुती मंदिर देवरुख मार्गावर पाणी चढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी मुळे बावनदीला पुर मुंबई - गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन बावनदी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत वाहतुक थांबवण्यात येणार आहे. तालुक्यातील निवधे पूल फूट ब्रीज वाहून गेला. तसंच निवधे गावाचा संपर्क तुटला.

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरीRainपाऊस