शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Politics : प्रशांत कोरटकरने महाराजांचा अपमान केला तेव्हा या संघटना कुठे होत्या? अमोल मिटकरींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:40 IST

Maharashtra Politics : आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर दंगलीवरुन प्रतिक्रिया दिली.

Maharashtra Politics ( Marathi News ) : औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरुन नागपुरातील  महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या दंगलीवरुन सवाल उपस्थित केले आहेत.

“नागपूरमधील प्रकार सुनियोजित पॅटर्न, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाहीत”; CM फडणवीसांचा इशारा

टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले. आमदार मिटकरी म्हणाले,दंगल भडकवणाऱ्यांना माझा प्रश्न आहे. औरंगजेबाची कबर उखडली तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? महाराष्ट्राचे प्रश्न मिटतील का? नागपुरातील प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यावेळी या संघटना पुढे का आल्या नाहीत?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. नागपुरात झालेल्या दंगलीवरुन मिटकरी यांनी संघटनांवर टीका केली. 

मिटकरी म्हणाले, महाराष्ट्राला या दंगली नको आहेत. या दंगल भडकवण्यामागे षडयंत्र कोणाचं आहे? यामागे सरकारला गालबोल लावायचं आहे का? लवकर यावर कारवाई केली पाहिजे. नागपुरात अशा घटना घडणे चुकीच्या आहेत. अशा घटना महाराष्ट्रामध्ये अशोभणीय आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

"संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे, औरंगजेबाची कबर हे पुरातत्व विभागाचा विषय आहे. ती कबर टी राजा याला फोडायची आहे. त्या टी राजा याने स्वत: हातात कुदळ घेऊन फोडायला जायला पाहिजे, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला. 

'मुळ प्रश्नाला बगल दिला नाही पाहिजे'

"सरकारमध्ये असताना माझी अशी मागणी आहे की, मुळ प्रश्नाला बगल दिली नाही पाहिजे. मागच्या अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता. आता उर्वरीत प्रश्नाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस