शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : "…त्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल," झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:34 IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, शिंदे गट, भाजप आणि राज्यपालांना न्यायालयाने फटकारले. शिंदे गटाने प्रतोदपदी केलेली भरत गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं. तर, १६ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. मात्र, शिंदे सरकार तरलं असून सध्यातरी राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाची टिपण्णी केली आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं हेच महाविकास आघाडी सरकारच्या अंगलट आलं आहे. यावर विधानसभेचे माजी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांचा विचार झाला असता असं सांगितलं जातं. परंतु राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयानं ताशेरे ओढलेत. तसंच १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे, त्यावर चर्चा होईल. १६ अपात्र झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे सरकार अजूनही टांगणीवर आहे असं म्हणायला हरकत नाही,” अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली. 

“आता व्हिप कोण बजावणार हाच प्रश्न आहे. गोगावले चुकीचे आहेत असं न्यायालय म्हणतं. गटनेता योग्य आहे किंवा नाही त्याबाबत संशय तयार होईल. गटनेता आणि प्रतोद पक्षप्रमुखांनी नेमायचे असतात, तर त्यांची बाजू घेण्याचं नाकारता येत नाही,” असंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर बरं राहिलं असतं असं न्यायालयाचं आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ते काही अंशी बरोबरही असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोर्टानं ताशेरे ओढलेत त्यावर आम्ही काही म्हणणार नाही. पण जी प्रक्रिया केली होती, त्यावरून १६ आमदार अपात्र केले होते. परंतु प्रत्येकाचं म्हणणं आम्ही केलेलं, राज्यपालांनी केलेलं बरोबर आहे असं म्हणणं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

“अपात्र करण्याच्या विचारावर चर्चा होणारे असं मी ऐकलंय. निकाल सांगतो की एकनाथ शिंदेंचं सरकार सध्या राहणार आहे. १६ आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीतला निर्णय होणं बाकी आहे. जर ते १६ आमदार अपात्र झाले, तर सरकार स्थिर कसं,” असंही झिरवळ म्हणाले. त्यावेळच्या प्रक्रियेत नार्वेकर नव्हते. मी आज तिथं नसतो तर ते प्रकरण माझ्याकडे आलं नसतं. पण आज मी तिकडेच आहे. तो निर्णय आजही आपल्यासमोरच होईल, असंही ते म्हणाले. 

“सरकारला दिलासा मिळालाय अशी बाहेरून चर्चा होतेय. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून शिंदे मुख्यमंत्री आहेत. १६ आमदारांचा अपात्रतेचा निर्णय बाकी आहे, त्यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे,” असंही झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे