शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis : "…त्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल," झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:34 IST

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये, शिंदे गट, भाजप आणि राज्यपालांना न्यायालयाने फटकारले. शिंदे गटाने प्रतोदपदी केलेली भरत गोगावलेंची नेमणूक बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयानं म्हटलं. तर, १६ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. मात्र, शिंदे सरकार तरलं असून सध्यातरी राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाची टिपण्णी केली आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं हेच महाविकास आघाडी सरकारच्या अंगलट आलं आहे. यावर विधानसभेचे माजी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांचा विचार झाला असता असं सांगितलं जातं. परंतु राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयानं ताशेरे ओढलेत. तसंच १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे, त्यावर चर्चा होईल. १६ अपात्र झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. त्यामुळे सरकार अजूनही टांगणीवर आहे असं म्हणायला हरकत नाही,” अशी प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली. 

“आता व्हिप कोण बजावणार हाच प्रश्न आहे. गोगावले चुकीचे आहेत असं न्यायालय म्हणतं. गटनेता योग्य आहे किंवा नाही त्याबाबत संशय तयार होईल. गटनेता आणि प्रतोद पक्षप्रमुखांनी नेमायचे असतात, तर त्यांची बाजू घेण्याचं नाकारता येत नाही,” असंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर बरं राहिलं असतं असं न्यायालयाचं आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ते काही अंशी बरोबरही असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोर्टानं ताशेरे ओढलेत त्यावर आम्ही काही म्हणणार नाही. पण जी प्रक्रिया केली होती, त्यावरून १६ आमदार अपात्र केले होते. परंतु प्रत्येकाचं म्हणणं आम्ही केलेलं, राज्यपालांनी केलेलं बरोबर आहे असं म्हणणं होतं, असंही त्यांनी नमूद केलं.

“अपात्र करण्याच्या विचारावर चर्चा होणारे असं मी ऐकलंय. निकाल सांगतो की एकनाथ शिंदेंचं सरकार सध्या राहणार आहे. १६ आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीतला निर्णय होणं बाकी आहे. जर ते १६ आमदार अपात्र झाले, तर सरकार स्थिर कसं,” असंही झिरवळ म्हणाले. त्यावेळच्या प्रक्रियेत नार्वेकर नव्हते. मी आज तिथं नसतो तर ते प्रकरण माझ्याकडे आलं नसतं. पण आज मी तिकडेच आहे. तो निर्णय आजही आपल्यासमोरच होईल, असंही ते म्हणाले. 

“सरकारला दिलासा मिळालाय अशी बाहेरून चर्चा होतेय. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून शिंदे मुख्यमंत्री आहेत. १६ आमदारांचा अपात्रतेचा निर्णय बाकी आहे, त्यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे,” असंही झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे