शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं...

By बाळकृष्ण परब | Updated: July 3, 2023 15:05 IST

Maharashtra Political Crisis: मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्ष फोडून त्यांच्या कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात. 

- बाळकृष्ण परब २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. सुरुवातीला उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदावरून वेगळी वाटचाल, मग फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, त्यानंतर शरद पवार यांच्या पुढाकाराने घातला गेलेला महाविकास आघाडीचा घाट, उद्धव ठाकरेंनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मग अडीच वर्षातच ठिसूळ झालेला महाविकास आघाडीचा पाया, एकनाथ शिंदेंचं बंड, मग शिंदे-भाजपा यांचं सरकार, कोर्टकचेऱ्या अशा सगळ्या घडामोडी घडून काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारनं वर्षपूर्ती केली होती. राज्याच्या राजकारणात  आता काहीशी स्थिरता येत आहे, असं वाटत असतानाच रविवारी मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला. यावेळी हादरला तो शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. रविवार सकाळपासून अचानक घडामोडी घडून दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. त्याचवेळी, मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात. 

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यानंतर २०१४ मध्ये भाजपाने केंद्रात स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली होती. तर तेव्हा आलेल्या मोदीलाटेचा फायदा उचलत विविध राज्यांमध्येही बहुमतासह सत्ता मिळवली होती. मात्र याला महाराष्ट्र राज्य अपवाद ठरलं होतं. खूप प्रयत्नांती भाजपा महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती. मात्र बहुमताचा आकडा गाठणं तेव्हाच्या मोदीलाटेतही भाजपाला शक्य झालं नव्हतं. चार पक्ष स्वतंत्र लढल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कडवी झुंट दिल्याने तेव्हा भाजपाचा खेळ बिधडला होता. त्यानंतरही भाजपाने महाराष्ट्रात जनाधार वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात फारसं यश मिळू शकलं नाही. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढण्याऐवजी घटल्या. त्यानंतर घडलेल्या घडामोडीत महाविकास आघाडीचा जन्म होऊन भाजपाला सत्तेबाहेर राहावे लागले. पुढच्या काळात भाजपाने स्वबळाच्या दिशेने पावले टाकून पाहिली. पण आपण स्वबळावर १४५ जागा जिंकू शकतो का? याबाबत भाजपाच्या मनात सातत्याने न्यूनगंडाची भावना निर्माण झालेली आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यातूनच गतवर्षी शिंदेंची साथ घेऊन युती सरकार स्थापन केलं गेलं. मात्र त्यातूनही पुढच्या निवडणुकीत गणित जमेल का याबाबत साशंकता असल्याने आता अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला सोबत  आणलं गेलं. आता त्यातून भाजपाचा काय फायदा होईल की हे प्रकरण भाजपावरच उलटेल हे पुढे दिसेल. 

२. महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्षांचा आधार लागण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक. भाजपा आणि मोदींसाठी ही निवडणूक मोठे आव्हान ठरणार आहे, असं आतापासूनच दिसतंय. भाजपाचा सहजासहजी पराभव होण्याची चिन्हे दिसत नसली तरी ही निवडणूक जिंकण्यासाठी मोदी आणि सहकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्नाटक, हिमाचलमध्ये झालेला पराभव, इतर राज्यांत बिकट परिस्थिती यामुळे २०२४ मध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपासाठी महाराष्ट्र हे राज्य महत्त्वाचे राज्य ठरणार आहे. महाराष्ट्रात ४० ते ४५ जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे. मात्र स्वबळावर किंवा शिंदे गटाच्या साथीने हे लक्ष्य साध्य होऊ शकत नाही, अशी चिंता भाजपाला सतावत आहे. तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त राहिल्यास लोकसभा आणि विधानसभेच्या अनेक मतदारसंघात भाजपाचं गणित बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर जागा जिंकायच्या असतील तर एकत्रित मतांची बेरीज ही ५१ टक्क्यांच्या पुढे जाणं आवश्यक आहे, हे भाजपच्या धुरिणांनी ताडलं होतं. त्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपाने सोबत घेऊन टक्केवारीतील तूट भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

३. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह पन्नास आमदार असले आणि शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली असली तरी एकनाथ शिंदेंचा जनमानसावर कितपत प्रभाव आहे, याबाबत भाजपाला शंका वाटते. त्यातच, कल्याण मतदारसंघावरून झालेली शाब्दिक चकमक, मग जाहिरातीवरून उडालेला खटका, यामुळे नेत्यांमध्ये नसली, तरी दुसऱ्या-तिसऱ्या फळीत धुसफूस असल्याचं जाणवतं. ती येत्या काळात शांत होईलच, हे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे भाजपाने 'प्लॅन बी' तयार ठेवल्याचंही काहींना वाटतंय. 

४. एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं असलं तरी, उद्धव ठाकरेंनाही जनतेमध्ये सहानुभूती असल्याचे दिसत आहे. त्यातच गेल्या काही काळात कुठलीही मोठी निवडणूक झालेली नसल्याने राज्य पातळीवर शिवसेनेचा मतदार किती प्रमाणावर कुणासोबत आहे हेही दिसून आलेलं नाही. त्यामुळे शिंदे आपल्याला किती उपयुक्त ठरतील. तसेच उद्धव ठाकरे किती मते आपल्याकडे खेचतील, याबाबत भाजपामध्ये शंका आहे. त्यातूनच निवडणुकीत शिंदेंना फारसा जनाधार न मिळाल्यास त्याची भरपाई करता यावी म्हणून अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना फोडून भाजपाने आपल्या बाजूने फिरवलेलं दिसत आहे. आता याचा भाजपाला कितपत फायदा किंवा तोटा होईल, हे निवडणुकांनंतरच दिसणार आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा