शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं...

By बाळकृष्ण परब | Updated: July 3, 2023 15:05 IST

Maharashtra Political Crisis: मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्ष फोडून त्यांच्या कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात. 

- बाळकृष्ण परब २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. सुरुवातीला उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदावरून वेगळी वाटचाल, मग फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, त्यानंतर शरद पवार यांच्या पुढाकाराने घातला गेलेला महाविकास आघाडीचा घाट, उद्धव ठाकरेंनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मग अडीच वर्षातच ठिसूळ झालेला महाविकास आघाडीचा पाया, एकनाथ शिंदेंचं बंड, मग शिंदे-भाजपा यांचं सरकार, कोर्टकचेऱ्या अशा सगळ्या घडामोडी घडून काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारनं वर्षपूर्ती केली होती. राज्याच्या राजकारणात  आता काहीशी स्थिरता येत आहे, असं वाटत असतानाच रविवारी मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला. यावेळी हादरला तो शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. रविवार सकाळपासून अचानक घडामोडी घडून दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. त्याचवेळी, मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात. 

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यानंतर २०१४ मध्ये भाजपाने केंद्रात स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली होती. तर तेव्हा आलेल्या मोदीलाटेचा फायदा उचलत विविध राज्यांमध्येही बहुमतासह सत्ता मिळवली होती. मात्र याला महाराष्ट्र राज्य अपवाद ठरलं होतं. खूप प्रयत्नांती भाजपा महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती. मात्र बहुमताचा आकडा गाठणं तेव्हाच्या मोदीलाटेतही भाजपाला शक्य झालं नव्हतं. चार पक्ष स्वतंत्र लढल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कडवी झुंट दिल्याने तेव्हा भाजपाचा खेळ बिधडला होता. त्यानंतरही भाजपाने महाराष्ट्रात जनाधार वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात फारसं यश मिळू शकलं नाही. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढण्याऐवजी घटल्या. त्यानंतर घडलेल्या घडामोडीत महाविकास आघाडीचा जन्म होऊन भाजपाला सत्तेबाहेर राहावे लागले. पुढच्या काळात भाजपाने स्वबळाच्या दिशेने पावले टाकून पाहिली. पण आपण स्वबळावर १४५ जागा जिंकू शकतो का? याबाबत भाजपाच्या मनात सातत्याने न्यूनगंडाची भावना निर्माण झालेली आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यातूनच गतवर्षी शिंदेंची साथ घेऊन युती सरकार स्थापन केलं गेलं. मात्र त्यातूनही पुढच्या निवडणुकीत गणित जमेल का याबाबत साशंकता असल्याने आता अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला सोबत  आणलं गेलं. आता त्यातून भाजपाचा काय फायदा होईल की हे प्रकरण भाजपावरच उलटेल हे पुढे दिसेल. 

२. महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्षांचा आधार लागण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक. भाजपा आणि मोदींसाठी ही निवडणूक मोठे आव्हान ठरणार आहे, असं आतापासूनच दिसतंय. भाजपाचा सहजासहजी पराभव होण्याची चिन्हे दिसत नसली तरी ही निवडणूक जिंकण्यासाठी मोदी आणि सहकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्नाटक, हिमाचलमध्ये झालेला पराभव, इतर राज्यांत बिकट परिस्थिती यामुळे २०२४ मध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपासाठी महाराष्ट्र हे राज्य महत्त्वाचे राज्य ठरणार आहे. महाराष्ट्रात ४० ते ४५ जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे. मात्र स्वबळावर किंवा शिंदे गटाच्या साथीने हे लक्ष्य साध्य होऊ शकत नाही, अशी चिंता भाजपाला सतावत आहे. तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त राहिल्यास लोकसभा आणि विधानसभेच्या अनेक मतदारसंघात भाजपाचं गणित बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर जागा जिंकायच्या असतील तर एकत्रित मतांची बेरीज ही ५१ टक्क्यांच्या पुढे जाणं आवश्यक आहे, हे भाजपच्या धुरिणांनी ताडलं होतं. त्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपाने सोबत घेऊन टक्केवारीतील तूट भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

३. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह पन्नास आमदार असले आणि शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली असली तरी एकनाथ शिंदेंचा जनमानसावर कितपत प्रभाव आहे, याबाबत भाजपाला शंका वाटते. त्यातच, कल्याण मतदारसंघावरून झालेली शाब्दिक चकमक, मग जाहिरातीवरून उडालेला खटका, यामुळे नेत्यांमध्ये नसली, तरी दुसऱ्या-तिसऱ्या फळीत धुसफूस असल्याचं जाणवतं. ती येत्या काळात शांत होईलच, हे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे भाजपाने 'प्लॅन बी' तयार ठेवल्याचंही काहींना वाटतंय. 

४. एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं असलं तरी, उद्धव ठाकरेंनाही जनतेमध्ये सहानुभूती असल्याचे दिसत आहे. त्यातच गेल्या काही काळात कुठलीही मोठी निवडणूक झालेली नसल्याने राज्य पातळीवर शिवसेनेचा मतदार किती प्रमाणावर कुणासोबत आहे हेही दिसून आलेलं नाही. त्यामुळे शिंदे आपल्याला किती उपयुक्त ठरतील. तसेच उद्धव ठाकरे किती मते आपल्याकडे खेचतील, याबाबत भाजपामध्ये शंका आहे. त्यातूनच निवडणुकीत शिंदेंना फारसा जनाधार न मिळाल्यास त्याची भरपाई करता यावी म्हणून अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना फोडून भाजपाने आपल्या बाजूने फिरवलेलं दिसत आहे. आता याचा भाजपाला कितपत फायदा किंवा तोटा होईल, हे निवडणुकांनंतरच दिसणार आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा