शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: 'राज्यपालांनी आता स्वत:हून अविश्वासदर्शक ठराव आणावा', दिपक केसरकर यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:44 IST

"आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं नाही. महाविकास आघाडीनं आपली नाटकं आता थांबवावीत"

मुंबई-

"आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं नाही. महाविकास आघाडीनं आपली नाटकं आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा", असं विधान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी केलं आहे. तसंच अविश्वासदर्शक ठरावाबाबत बोलत असताना त्यांनी याबाबत आता थेट राज्यपालांनीच निर्णय घ्यावा असंही साकडं घातलं आहे. 

निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

"राज्यपालांनी आता सरकारनं तीन दिवसात काढलेल्या जीआरची माहिती मागवली आहे. त्याचप्रमाणे ते आता सुप्रीम कोर्टात आमच्या याचिकेची दखल घेतील आणि स्वत:हून अविश्वास दर्शक ठराव आणावा, अशी मागणी दिपक केसरकर यांनी केली आहे. राज्यात आता महाविकास आघाडीकडे बहुमत राहिलेलं नाही हे सर्वांना माहित आहे. शिंदे गटात असलेले आमदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे पक्षप्रमुखांना माझी विनंती आहे की त्यांनी याची दखल घेऊन आता भाजपाशी बोलून तडजोड करुन सन्माननं सरकार स्थापन करावं, असंही केसरकर म्हणाले. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहण्याचीच त्यांची भूमिका अजूनही कायम असेल तर तेही त्यांनी स्पष्ट सांगावं. आम्ही काही केलं तरी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत येणार नाही, असं ठाम मत दीपक केसकर यांनी व्यक्त केलं आहे. 

राऊतांनी आम्हाला परत येण्यापासून रोखलंराज्यातील सत्तासंघर्ष केव्हा संपणार आणि तुम्ही सर्व केव्हा परतणार याबाबत दीपक केसरकर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आम्हाला संजय राऊत यांनी महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं आहे. त्यांनाच विचारा, असा आरोप केला आहे. "संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवलं आहे. आमची कार्यालयं फोडली जात आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीत कसं परतणार? संजय राऊत यांनीच आम्हाला परत येण्यापासून रोखलं आहे. त्यामुळे आम्ही कधी परत येणार हे त्यांनाच विचारा", असं दीपक केसरकर म्हणाले. 

फडणवीस रात्री १२ वाजताही फोन उचलतातदीपक केसरकर यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं. "देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचा राजकारणाच्या पलिकडे जाऊन वैयक्तिक पातळीवरही चांगले संबंध आहेत. त्यांनी मतदार संघाशी निगडीत कामांसाठी रात्री १२ वाजता देखील आमचे फोन उचलले आहेत. त्यामुळे एका भाजपा शासित राज्यात जर आम्ही असून आणि त्यांनी आम्हाला मदत केली तर यात चुकीचं काय?", असं सवाल दिपक केसरकर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDeepak Kesarkarदीपक केसरकर