शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 11:34 AM

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.

मुंबई : मनसेने रविवारी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मनसेला टोला लगावला आहे. गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले असल्याचे, सामंत यांनी म्हटले आहे.

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले की, मनसेने काही दिवसांपूर्वी त्यांचा झेंडा बदलला, विचारधारा बदलली आणि त्यांच्यानंतर त्यांचा काढलेला हा पहिला मोर्चा आहे. हा मोर्चा चांगला झाला की वाईट हे आपल्याला निवडणुकीनंतर कळणार आहे.

तर या मोर्च्याचे रुपांतर जर मतांमध्ये झाले तरच या मोर्च्याला काही अर्थ आहे. मात्र या पक्षांची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या नेत्यांच्या सभेला आणि भाषणांना गर्दी होते, पण त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने अनेकवेळा दाखवून दिले असल्याचा टोला त्यांनी मनसेला लगावला. तसेच हा मोर्चा मनसेने स्वता: काढला आहे की त्यांना भाजपने काढायला सांगितला आहे, हे मला सांगता येणार नाही.परंतु या मोर्च्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नसल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.