शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019: ...तर राज ठाकरे फॅक्टर ठरू शकला असता 'गेम चेंजर'! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:12 PM

Maharashtra Lok Sabha Elections 2019: राज ठाकरे यांच्या अपयशाला त्यांचं चुकलेलं गणितच जबाबदार म्हणावं लागेल.

ठळक मुद्देराज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'नरेंद्र मोदींना पाडा' असा जणू विडाच उचलला होता. राज यांनी केलेली हवा मोदी लाटेला रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं आजच्या निकालांमधून स्पष्ट झालं. मनसेचे शिलेदार - इंजिनाच्या चिन्हावर लढणारे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवायला हवे होते. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'नरेंद्र मोदींना पाडा' असा जणू विडाच उचलला होता. राज्यभरात ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन त्यांनी, मोदी-शहा जोडीला राजकीय क्षितीजावरून हटवण्याचं आवाहन केलं होतं. 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली होती. पुलवामा हल्ल्यावरून मोदी-अजित डोवाल यांच्यावर 'सर्जिकल स्ट्राईक' केला होता. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली, राज्यातच नव्हे तर देशभर 'हवा' झाली, पण ही हवा मोदी लाटेला रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं आजच्या निकालांमधून स्पष्ट झालं आहे. या अपयशाला राज ठाकरे यांचं चुकलेलं गणितच जबाबदार म्हणावं लागेल. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज या चुकीवर बोट ठेवलं. 

राज ठाकरे यांनी प्रत्येक सभेत मोदीविरोधी प्रचार केला, पण कुणाला मत द्या, हे कुठेच सांगितलं नाही. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात, राहुल गांधींना संधी देऊन पाहू, असं सूचक विधान त्यांनी केलं होतं. परंतु, एकदम ३६० डिग्री मन(से)परिवर्तन सैनिकांना झेपेल का, हा विचार त्यांनी करायला हवा होता. मनसैनिक 'नोटा'ला मतं देण्याची शक्यता त्यांनी लक्षात घ्यायला हवी होती.  

२०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना जाहीर पाठिंबा दिला होता. परंतु, त्यावेळीही त्यांनी निवडक जागांवर मनसेचे उमेदवार दिले होते. त्यांना मतंही चांगली मिळाली होती. कारण, कट्टर मनसैनिकांना मतं देण्यासाठी हक्काचा उमेदवार होता. राज ठाकरेंनी मोदींना मत द्यायला सांगूनही हजारो मतदारांनी मनसेच्या उमेदवारांना मतं दिली होती. या अनुभव लक्षात घेऊन, राज ठाकरे यांनी या निवडणुकीतही एक संधी अजमावून पाहायला हरकत नव्हती. त्यांनी मोजके का होईना, मनसेचे शिलेदार - इंजिनाच्या चिन्हावर लढणारे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवायला हवे होते. 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा केला, तेव्हा त्यांना नक्कीच आपल्या ताकदीचा अंदाज आला असेल. त्यानुसार, त्यांनी काही जागा लढवल्या असत्या तर त्या ठिकाणी मतविभाजन होऊन - त्यांचा जो मोदींना धक्का देण्याचा हेतू होतो - तो साध्य होण्याची शक्यता होती. मनसैनिकांना मत देण्यासाठी हक्काचा पर्याय मिळाला असता. तसंच, राज 'पोपट' बनून काम करत असल्याचा ठपकाही टाळता आला असता. त्यांचं बोलणं अधिक गांभीर्याने घेतलं गेलं असतं. त्याकडे करमणूक म्हणून किंवा मोदींबद्दलचा द्वेष म्हणून नव्हे - तर त्यांचा पक्षाचा प्रचार म्हणून पाहिलं गेलं असतं. सभांना होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होण्याचं प्रमाण वाढलं असतं. पण, राज यांनी नेहमीप्रमाणेच 'अनाकलनीय' विचार केला आणि सगळंच गणित चुकलं.

मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आज निकालांनंतर हाच मुद्दा मांडला. राज ठाकरे यांनी स्वतःचे उमेदवार उभे करायला हवे होते, असं त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडी रिंगणात उतरल्यानं झालेल्या मतविभाजनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे साधारण डझनभर उमेदवार पडल्याचं चित्र आहे. मनसे रिंगणात असती, तर भाजपा-शिवसेनेची मतंही फुटली असती, असं त्यांचं सरळ गणित होतं. अर्थात, तसं झालंच असतं असं नाही, पण राज ठाकरेंची 'मीम्स' तरी बनली नसती, एवढं नक्की!

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Raj Thackerayराज ठाकरे