शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

तिढा सुटला, सामंतांनी दावा सोडला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 11:45 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले किरण सामंत यांनी दावेदारी माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, आता भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावेदारी माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, आता या मतदारसंघातून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. नारायण राणे हे १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असलील, तसेच आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ, असे उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.   

सामंत बंधूंनी प्रसारमाध्यमांना संबोधित करत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरील दावेदारी सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपाकडून मतदारसंघामधून उमेदवार म्हणून नारायण राणे यांच्या नावाची तातडीने घोषणा करण्यात आली आहे. नाराणय राणे यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते केंद्रात मंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-मालवण आणि मालवण या विधानसभा मतदारसंघांचंही प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच त्यांना राज्यसभा सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची नारायण राणे यांची ही पहिलीच वेळ आहे.  

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावेदारी सोडत असल्याचे सामंत बंधूंनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केले. यावेळी उदय सामंत म्हणाले की, ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखी व्यक्ती स्वत: हस्तक्षेप करते. मुख्यमंत्री काही सूचना करतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे पूर्वीपासूनचे सहकारी असलेली व्यक्ती काही गोष्टी सांगते, तेव्हा काही गोष्टींमध्ये चार पावलं मागे यावं, असं आम्ही चर्चा करून ठरवलं. पण चार पावलं मागे आलो, म्हणजे भविष्यात आपण काहीच करायचं असं होत नाही. आम्ही ज्या मुद्द्यांवर ठाम होतो, त्यावर आजही ठाम आहोत. किरण सामंत यांना आज ना उद्या खासदार करायचं हे निश्चित आहे. त्यामुळे आज जो काही तिढा निर्माण झाला होता, तो सोडवण्यासाठी किरण सामंत यांनी स्वत: पुढाकार घेतला, असे उदय सामंत यांनी सांगितले.

तसेच आम्ही काही काळ थांबवण्याचा निर्णय घेतला असला तरी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नारायण राणे यांच्यासोबत उपस्थित राहणार आहोत. तसेच हा निर्णय घेतला म्हणजे आम्ही किंवा आमचं कुटुंब राजकारणातून थांबलो असा होत नाही, असे सूचक संकेतही उदय सामंत यांनी दिले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Uday Samantउदय सामंतBJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४