शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 16:46 IST

भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं.

मुंबईः भाजपा हा गोंधळ घालण्यासाठी अतिशय योग्य असा पक्ष आहे. कदाचित त्यांना गोंधळ कसा घालावा हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, असं मला वाटतं. गेल्या पाच वर्षांत ते कसं सरकार चालवत होते हे आपण पाहिलंच आहे. यापुढे भाजपाला नुसताच गोंधळ घालायचा असेल आणि वाद करायचा असेल तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही. त्या ठिकाणी योग्य प्रकारे उत्तर देऊ, असं नवनिर्वाचित आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारनं बहुमत सिद्ध केल्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी त्यांनी बातचीत केली आहे, त्यावेळी ते बोलत होते.गोंधळ त्यांनी घातला पण काय शिकायचं आणि काय नाही शिकायचं हे आपल्यावर असतं. तिथं भाजपा किंवा त्यांचे जे काही सहकारी असतील, त्यांनी पाच वर्षं आर्थिक दृष्टिकोनातून गोंधळ घातला. कामकाज ते चांगल्या पद्धतीनं चालवू शकले नाहीत, लोकांनीच त्यांना बाहेर काढलं. आता स्वतःहून पुढे येऊन नवीन मुख्यमंत्र्यांचं स्वागत न करता, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान न ठेवता त्या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना हे दाखवायचं होतं की त्यांना किती आकडे कळतात. त्यांना किती कायदा कळतो. पण आम्ही 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्याचा अर्थ सर्वाधिक लोक हे महाविकास आघाडीकडे होते.असं असतानाही प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी शांत होता. त्या ठिकाणी शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडली. विधानसभेचा मान ठेवणं ही प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे. उगाच कोणताही मुद्दा घेऊन कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू, आम्ही लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार आहोत. मुद्दा बाजूला ठेवून उगाच काही तरी बोलायचं ते काही योग्य नाही. भाजपा आमदारांना खुणवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते. परंतु असा प्रकार त्यांनी यापुढेही चालू ठेवल्यास आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना