शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, तर...; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 19:32 IST

राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणे येथे, हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीनही कंपन्यांनी प्रत्येकी 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे.

ठळक मुद्देहे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत.चीनच्या तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी सामंजस्य करार केला आहे.या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ ते रद्द केले, असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चीनच्या हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी सामंजस्य करार केला आहे.

एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणे येथे, हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीनही कंपन्यांनी प्रत्येकी 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. एकूण 5 हजार 20 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यांत झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांचे संबंध जबरदस्त ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर बंधी घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यातच, महाराष्ट्र सरकारनेही चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द केल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, देसाई यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

देशभरात चिनी वस्तूंविरोधात लाट -चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले आहे. आता चीन सीमेवरही कुरापती काढत आहे. यामुळे संपूर्ण देशभरातच चिनी वस्तूंविरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. देशभरांतील बाजारपेठांत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा होतांना दिसत आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

चीनला घेरण्याची पूर्ण तयारी -गलवानमधील हिंसक चकमकीनंतर भारतचीनला घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. भारताने आपले शक्तीशाली, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सु-सज्ज आणि अचूक निशाणा असणारे, मिराज-2000 आणि सुखोई-30 सारखी लढाऊ विमानं, तसेच अपाचे आणि चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स चीनच्या रोखानं एलएसीवर तैनात केली आहेत. तर दुसरीकडे चीनही त्यांच्या हद्दीत युद्धाची तयारी करताना दिसत आहे. तेही सीमेजवळ सान्याची आणि युद्ध सामग्रीची जमवाजमव करत आहेत. 

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाईShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रchinaचीन