शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Maharashtra Government: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 05:44 IST

मंत्रिमंडळ बनविणे व त्याचा विस्तार तसेच घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी तीनही पक्षांनी दोन समित्या स्थापन केल्या आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे.सूूत्रांनी सांगितले की, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवेसना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे मत आहे. जनकल्याणासाठी काही निर्णय तातडीने घेण्याची उद्धव ठाकरे यांना इच्छा आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर लागणार असल्याने त्यासाठी सर्वांनाच काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. मंत्रिमंडळ बनविणे व त्याचा विस्तार तसेच घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी तीनही पक्षांनी दोन समित्या स्थापन केल्या आहेत.अजित पवारांना स्थिरस्थावर होण्यासाठी अजून वेळ हवा भाजपबरोबर हातमिळवणी करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करायला निघालेल्या अजित पवारांचे बंड फसले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व पुन्हा राष्ट्रवादीत परतले. मात्र तरीही त्यांची नाराजी अजूनही संपलेली नाही. त्यांच्या राजकीय हालचालींमुळे माजलेला गोंधळ आता शमला असला तरी अजित पवार यांना स्थिरस्थावर होण्यासाठी अजून काही वेळ हवा आहे. ते लवकरच आपल्या विधानसभा मतदारसंघाला भेट देण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार