शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 05:15 IST

राज्यात बिगर भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात बिगर भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असून या संयुक्त सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला आणि त्यानंतरच राजकीय घडामोडींना वेग आला. सरकार स्थापन करण्यास भाजपने नकार दिल्यानंतर नव्या राजकीय समिकरणांची जुळवासुळव सुरू झाली. शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस आणि राष्टÑवादीने सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल या नेत्यांना मुंबईला पाठवले. पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. दिल्लीबाहेर पडून एखाद्या राज्याचे सरकार बनवण्यासाठी पटेल यांनी दाखवलेली सक्रियता बघता शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी गंभीर असल्याचे दिसते.शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिल्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या समर्थनाचे पत्र देण्याचा विषय आला, त्यावेळी राष्टÑवादीची भूमिकाच ठरलेली नव्हती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ज्या दिवशी पत्र देण्याचा विषय आला त्यादिवशी सोनिया गांधी यांनी सायंकाळी शरद पवार यांना फोन केला. आपण कसे एकत्र यायचे, त्यासाठी कोणते मुद्दे असतील, अशी विचारणा केली. त्यावर पवार यांनीही याविषयी आधी स्पष्टता गरजेची आहे, नाहीतर नंतर वाद होतील. शिवसेनेशी सगळ्या मुद्यांवर चर्चा पूर्ण करु, नंतर पाठिंबा देऊ असे सांगितले. त्यामुळेच आम्ही पाठिंब्याचे तयार असलेले पत्र थांबवले, असेही चव्हाण यांनी सांगितले.शिवसेनेला पाठिंबा दिला तर अल्पसंख्याक समाजाची भूमिका काय असेल असा मुद्दा दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या समोर आला तेव्हा राष्टÑवादीमधील अनेक मुस्लीम नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाऊ नका, पण शिवसेना चालेल, असे जाहीर बैठकीत शरद पवार यांना सांगितल्याचे समजते. दिल्लीत नसीम खान यांनी शिवसेनेसोबत जाण्याकरता बाजू मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. मला शिवसेनेच्या उमेदवारांनी पराभूत केले असले तरीही आपण भाजपचे सरकार येऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी शिवसेनेसोबत गेलो तरी चालेल, असेही सांगितल्याचे समजते. खा. हुसेन दलवाई यांनीही असे पत्र दिले. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पाठिंब्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.>काम करत गेले की, अनुभव येतोशिवसेनेतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी ज्यांचे नाव येईल त्यांना या पदाचा अनुभव असेल का? असे विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्यांच्या नेत्यांना पक्ष चालवण्याचा अनुभव आहेच. शिवाय प्रशासकीय कामांचा अनुभव हा काम करत गेले की येतोच. फक्त परिश्रम करण्याची इच्छा आणि परस्पर विश्वास ठेवला तरी खूप गोष्टी सोप्या होतात.>दिल्लीच्या ग्रीन सिग्नलनंतरच...काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे हे नेते दिल्लीने ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. ही भेट मातोश्रीवर नको असे या तिघांचे म्हणणे होते. किंबहुना तशा सूचनाही होत्या. ठाकरे यांनीही दोन पावलं पुढे येत बीकेसीमधील एका हॉटेलमध्ये ही भेट घेतली.>राष्ट्रवादीत दोन गटराष्ट्रवादीमधला संख्येने कमी असणारा एक गट भाजपसोबत जाण्यासाठी तर दुसरा गट शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही होता. जर आपण भाजपसोबत गेलो तर शरद पवार यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने जी उंची गाठली त्यालाच धक्का बसेल असे काही ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.>खा. संजय राऊत यांचे इंग्रजी, हिंदी टि्वटकाँग्रेस नेते अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची बातमी येताच अशी भेट झालीच नाही, पण आमचे काँग्रेस आणि राष्टÑवादीसोबत बोलणे चालू आहे, असे टष्ट्वीट संजय राऊत यांनी केले. त्यांनी हे टष्ट्वीट का केले, हे गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे