शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : काँग्रेसकडून नाना पटोले यांना मिळणार विधानसभाध्यक्ष पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 11:02 IST

काँग्रेसकडून नाना पटोले यांना विधानसभाध्यक्ष पद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 

ठळक मुद्देकाँग्रेसकडून नाना पटोले यांना विधानसभाध्यक्ष पद मिळणार काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची शनिवारी (30 नोव्हेंबर) शक्तिपरीक्षा होणार आहे. सरकारतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. त्यासाठी विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. काँग्रेसकडूननाना पटोले यांना विधानसभाध्यक्ष पद मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. 

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. नाना पटोले यांचं नाव असून ते आज अर्ज भरणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. 'काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विधीमंडळ कामकाजाचा अनुभव आहे' असं थोरात यांनी म्हटलं आहे. 

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित झाले होते. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे व उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत काँग्रेसने अध्यक्षपदाची मागणी केली होती. त्यात आता बदल करणे योग्य होणार नाही, असे सांगून राष्ट्रवादीने अध्यक्षपद घेण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघांपैकी एकाचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जात होते. मात्र आता बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले हे अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. 

महाविकासआघाडीचे सरकार पुढील 30 वर्षं टिकेल असा विश्वास काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वामध्ये राज्यात एक सक्षम सरकार तयार होणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या भावना सगळ्यांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याची आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम हे सरकार करणार असल्याचे देखील नाना पटोले यांनी सांगितले आहे.

नाना पटोले हे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघातून निवडून आले होते. 2014 मध्ये नाना पटोल यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाचे राजेश काशिवार विजयी झाले होते. नाना पटोले यांना पुन्हा एकदा 2019 मध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याने साकोलीमध्ये काँग्रेसचे पारडे जड झाले. साकोली मतदारसंघात भाजपाचे परिणय फुके यांनी सुरुवातील आघाडी घेतली. मात्र, नंतर नाना पटोले यांनी त्यांच्यावर मात करीत विजय मिळवला.  

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे