शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने ग्रामीण भागात रिकाम्या हातांना दिले काम,५१ लाख कामगारांची नोंद; जवळपास ३८ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:52 IST

गेल्या दोन वर्षांत राज्यात कामगारांच्या संख्येत जवळपास ३८ टक्के वाढ झाली

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) देशभरात सहभाग कमी होत असताना महाराष्ट्राने या योजनेत ग्रामीण रोजगारात लक्षणीय वाढ नोंदविली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत राज्यात कामगारांच्या संख्येत जवळपास ३८ टक्के वाढ झाली आहे, तर अनेक राज्यांमध्ये ती घटली किंवा स्थिर आहे.

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०२४-२५ आर्थिक वर्षात महाराष्ट्राने ५१ लाख कामगारांना रोजगार दिला. तो २०२२-२३ मध्ये ३७लाख होता. देशातील एकूण मनरेगा रोजगारात घट होत असतानाच ही वाढ झाली आहे. देशातील एकूण मनरेगा कामगारांची संख्या ८.७५ लाखांवरून ७.८८ लाखांवर आली आहे. म्हणजे, १० टक्के घट झाली आहे. २०२५-२६ मध्ये महाराष्ट्राचा वेतनदर प्रतिदिन ३१२ रुपये आहे. जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. पण देशातील सर्वाधिक वेतन देणाऱ्या राज्यांपेक्षा कमी आहे. पंजाबने गेल्या तीन वर्षापासून दरवर्षी दहा लाख कामगारांना रोजगार देत स्थिरता राखली आहे. हरयाणामध्ये मात्र २५ टक्क्यांची वाढ झाली असून, कामगारांची संख्या चार लाखांवरून पाच लाख झाली आहे. हे राज्य आता देशातील सर्वाधिक मनरेगा वेतन देणाऱ्या राज्यांपैकी एक असून, दररोज ४०० रुपये इतके वेतन दिले जाते.

पश्चिम बंगाल २० लाखांवरून शून्यावर

 सर्वात नाट्यमय बदल पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. तिथे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २० लाख कामगारांची नोंद झाली होती. परंतु आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये त्यांचा सहभाग शून्य होता. गुजरातमध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये २२४ रुपयांवरून २०२५-२६ मध्ये २८८ रुपयांपर्यंत वेतन वाढले असले तरी, दोन वर्षांत कामगारांची संख्या १६ लाखांवरून १३ लाखांवर आली आहे. बिहारमध्ये किरकोळ घट झाली असून, कामगारांची संख्या ५८ लाखांवरून ५६ लाख झाली आहे. ते सर्वांत कमी वेतन देणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये आहे. त्यांचे दैनिक वेतन २५५ रुपये आहे.

३८% राज्यात कामगारांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत वाढ झाली आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रjobनोकरी