शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 09:07 IST

नांदेडला सर्वाधिक फटका

गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसाने मुंबई, कोकणासह विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना अक्षरश: झोडपून काढले. नदी-नाल्यांना आलेले पूर व जलप्रकल्पांमधून विसर्ग सोडल्याने अनेक जिल्ह्यांतील गावे पाण्याखाली गेली आहेत. शहरी भागातील वस्त्याही जलमय झाल्या. पिके खरडून निघाली. विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

मराठवाड्यात ११ जीव गेले, नांदेडला सर्वाधिक फटका

बीड: मागील पाच दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. १४ ते १९ ऑगस्ट या कालावधीत ११ जणांचा जीव गेला आहे. सोबतच ४ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून तब्बल ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला असून, अजूनही सरी बरसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले असून, सहा दरवाजे उघडले आहेत. यासह इतरही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.

४९८ जनावरे दगावली

या पावसात ४९८ जनावरे दगावली आहेत. यात लातूरमध्ये २४५, तर नांदेडमधील १२६ जनावरांचा समावेश आहे. त्यातही गाय, म्हैस अशा दुधाळ जनावरांची संख्या अधिक आहे.

कोणी पुरात तर कोणी धबधब्याखाली बुडाले

पाच दिवसांत तब्बल ११ जणांचा जीव गेला आहे. यात सर्वाधिक ७ जण हे नांदेड जिल्ह्यातील असून बीड व हिंगोलीतील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

शेतीचे मोठे नुकसान

मराठवड्यातील ८ हजार १६८ हेक्टरवरील बागायत आणि १९८ हेक्टरवर फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत शेती नुकसानीचा आकडा साडेतीन लाख एवढा आहे.

घरांची पडझड, ५८८ जणांचे संसार उघड्यावर

पावसाने ५८८ लोकांचा संसार उघड्यावर आला आहे. पत्रे उडणे, भिंत पडणे अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यातही सर्वाधिक २७५ घटना नांदेड जिल्ह्यात घडल्या असून छत्रपती संभाजीनगर ६३, लातूर ८२, धाराशिव ६४ यांचा समावेश आहे.

पंचनामे कधी करणार?

मराठवाड्यात पावसाने नुकसान झाल्यानंतर अद्यापही प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाही. हा नुकसानीचा अहवाल प्राथमिक असल्याचा दावा केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात पंचनामे कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी देणार? हा प्रश्न आहे

कोल्हापुरातील ८० बंधारे पाण्याखाली,  गगनबावडा मार्ग बंद

कोल्हापूर: जिल्ह्यात सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तब्बल ८० बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तळकोकणाला जोडणारा कोल्हापूर ते गगनबावडा मार्ग बंद झाला आहे. पंचगंगा नदीने ३६ फुटांची पातळी ओलांडली असून, इशारा पातळीकडे (३९ फूट) वाटचाल सुरू केल्याने कोल्हापूरकर धास्तावले आहेत. कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तेथील जलसंपदा विभागाने मंगळवारी विसर्गही एक लाख ७५ हजार क्युसेकपर्यंत वाढवला आहे. ६८ ठिकाणी मालमत्तांची पडझड झाली.

सांगली जिल्ह्यातही जोरधार शिराळ्यात अतिवृष्टी

सांगली: जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू असून, शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. वारणा धरणातून सध्या २९ हजार ९८५ क्युसेकने विसर्ग चालू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला, दरवाजे ९ फुटांवर

सातारा: जिल्ह्यात धरण क्षेत्रांत पावसाचा जोर असल्याने विसर्ग वाढविला आहे. मोठ्या ६ आणि मध्यम ८ अशा १४ प्रकल्पातून सुमारे ९५ हजार क्युसेक पाणी विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणाचे दरवाजे ९ फुटांपर्यंत वर उचलून पाणी सोडले जात आहे.

वऱ्हाडात ५ दिवसांत २६ जणांचा मृत्यू , ८१८८ घरांची पडझड

अमरावती/अकोला/नागपूर: विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ ऑगस्ट या पाच दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे घरे, पिके आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये तब्बल ८१८८ घरांची पडझड झाली आहे. संततधार पावसामुळे अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात प्रकल्प तुडुंब भरले असून, विसर्गामुळे नदी-नाल्यांना पूर आहे.

पाच दिवसांतील हानी

  • २६ तालुक्यांना फटका
  • ७६० गावांमध्ये घरांचे नुकसान
  • २५० जनावरांचा मृत्यू 
  • १२७.५ % अमरावती विभागातील आतापर्यंतचा पाऊस

(विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल)

जिल्हानिहाय मृतांची संख्या

अमरावती विभागात वीज पडून, पुरात वाहून जाणे किंवा पावसाच्या इतर आपत्तीमुळे २६ जणांचा मृत्यू झाला. त्यात यवतमाळमध्ये ११, बुलढाणा ८, अकोला ३, तर अमरावती व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यात  ७० गावे संपर्काबाहेर

गडचिरोली: भामरागडसह ७० गावांचा तुटला संपर्क, नाला ओलांडताना युवक गेला वाहून, १३ मार्ग पाण्याखाली

भंडारा: गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. यवतमाळ : प्रकल्पाचे पाणी सोडल्याने उमरखेड, महागाव तालुके जलमय

वर्धा: पुरात एक व्यक्ती वाहून गेला.

दुधना नदीपुलावरून दुचाकीसह दोघे गेले वाहून

सेलू (जि. परभणी): निम्न दुधना धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वालूर ते सेलू मार्गावरील राजवाडी पुलावरून पाणी वाहत आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राजवाडी पुलावरील पाण्यातून दुचाकीने जाणारे दोघेजण दुचाकीसह वाहून गेले.  मारोती हारकळ (४५, रा. वालूर), छबूराव जावळे (५०, रा. गुळखंड) अशी त्यांची नावे आहेत.

कोकणात चिपळूण, राजापुरात पूरस्थिती

रत्नागिरी/सिंधुदुर्ग: रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मुख्य नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी चिपळूण आणि राजापूर शहरात शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने पाणी ओसरू लागले आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने पूरस्थिती कायम आहे. ग्रामीण व राज्य मार्गावर पाणी आल्याने आणि काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :Rainपाऊस