शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:21 IST

CM Devendra Fadnavis on Wet Drought in Maharashtra: महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूरपरिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पिकांबरोबर जमिनीही वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

Wet Drought in Maharashtra Latest News: अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील काही भागांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेतला जाण्याची आशा व्यक्त केली जात होती. पण, तसा निर्णय झालेला नाही. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयात नियमांचा अडथळा निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबद्दल बोलताना सरकारची सविस्तर भूमिका मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण, नियमांमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही."

दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय

याच मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "तथापि आम्ही हा निर्णय घेतला की, ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या-ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो, त्या सगळ्या सवलती आता यालाही (ओला दुष्काळ) म्हणजे दुष्काळ तर त्याला आपण टंचाई म्हणतो. तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे, असे समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे."

"जी काही मागणी होती, ती त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजे किंवा ओला दुष्काळ जाहीर करा, याचा अर्थच तो असतो की, त्या सवलती (दुष्काळाच्या) लागू करा; तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

आम्ही तिघे एका आठवड्यात घोषणा करू -मुख्यमंत्री फडणवीस

"मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही. कारण आता ही नुकसानीची सगळी आकडेवारी जमा होत आहे. ती पुढच्या दोन-चार दिवसात जमा होईल आणि लवकर, कोणत्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार बसून निर्णय घेऊ आणि त्यासंदर्भातील घोषणा आम्ही करू", असे मुख्यमंत्री फडणवीस राज्य सरकारची भूमिका मांडताना म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra floods: CM addresses wet drought declaration challenges, relief measures.

Web Summary : CM Fadnavis clarifies that declaring a 'wet drought' faces regulatory hurdles. However, the government will implement drought relief measures. A decision on further assistance will be announced within a week.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारfloodपूरFarmerशेतकरी