शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कपिल सिब्बल मांडणार बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 18:27 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला होता.

मुंबई : राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ न दिल्याचा आरोप करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार असून न्यायमूर्ती शरद बोबडे ही सुनावणी घेणार आहेत. 

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, त्या पक्षांनी पत्रे दिली नव्हती. यामुळे शिवसेनेने तीन दिवसांची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही वेळ नाकारत राष्ट्रवादीलाच सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, राष्ट्रवादीनेही वेळ वाढवून मागितल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 

दरम्यान शिवसेनेची याचिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हे लढविणार असून सरकारी पक्षाकडून निशांत काटनेश्वर हे युक्तीवाद करणार आहेत. काटनेश्वर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिव सेनेने राज्यापालांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केल्याचे समजले असून अद्याप त्याची प्रत मिळालेली नाही. ही प्रत मिळाल्यानंतर त्यामधील आरोप, मुद्दे वाचून पुढील पाऊल उचलले जाणार आहे.  

तर शिवसेनेचे वकील राजेश इनामदार यांनी सांगितले की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे समजते आहे. आता यावर कायदेशीर लढा होऊदे. आम्ही यावरही गरज लागली तर याचिका दाखल करू आणि कायदेशीर मदत घेऊ. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलPresident Ruleराष्ट्रपती राजवट