शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कपिल सिब्बल मांडणार बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 18:27 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला होता.

मुंबई : राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी पुरेसा वेळ न दिल्याचा आरोप करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार असून न्यायमूर्ती शरद बोबडे ही सुनावणी घेणार आहेत. 

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, त्या पक्षांनी पत्रे दिली नव्हती. यामुळे शिवसेनेने तीन दिवसांची वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यपालांनी ही वेळ नाकारत राष्ट्रवादीलाच सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, राष्ट्रवादीनेही वेळ वाढवून मागितल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 

दरम्यान शिवसेनेची याचिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हे लढविणार असून सरकारी पक्षाकडून निशांत काटनेश्वर हे युक्तीवाद करणार आहेत. काटनेश्वर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिव सेनेने राज्यापालांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केल्याचे समजले असून अद्याप त्याची प्रत मिळालेली नाही. ही प्रत मिळाल्यानंतर त्यामधील आरोप, मुद्दे वाचून पुढील पाऊल उचलले जाणार आहे.  

तर शिवसेनेचे वकील राजेश इनामदार यांनी सांगितले की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे समजते आहे. आता यावर कायदेशीर लढा होऊदे. आम्ही यावरही गरज लागली तर याचिका दाखल करू आणि कायदेशीर मदत घेऊ. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलPresident Ruleराष्ट्रपती राजवट