शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:02 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांच्या पारंपारिक गडावर विशेष लक्ष केंद्रीत ठेवले आहे.

पुणे - इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश देत शरद पवारांनीभाजपासह पुतण्या अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार स्वत: निवडणुकीची रणनीती आखत आहेत त्यातूनच कोल्हापूर, इंदापूर आणि येणाऱ्या काळात फलटणमध्येही पवार त्यांची खेळी खेळणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरातील माजी आमदार असून त्यांनी याआधी शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही काळात मंत्रि‍पदे भूषावली आहेत. मात्र २०१४ आणि २०१९ यात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केले. 

सध्या इंदापूरातील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. २०२४ मध्ये भरणे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपाला रामराम केला. साखरपट्टा भाग असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सहकार चळवळीतील नेते म्हणून भाजपाला हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्याने फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात कोल्हापूरात समरजितसिंह घाटगे यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

पक्ष सोडलेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मधुकर पिचड जे शरद पवारांचे निकटवर्तीय होते त्यांनी २०१४ साली भाजपात प्रवेश केला तेदेखील घरवापसीच्या तयारीत आहेत. पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी पराभूत केले. सध्या आमदार किरण लहामटे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे वैभव यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता अधिक आहे. मागील काही दिवसांपूर्वी पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याचेही पुढे आले.

महायुतीमुळे फक्त भाजपालाच नाही तर अजित पवारांनाही फटका बसताना दिसत आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढ्याचे बबन शिंदे हेदेखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील असं सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यातूनच भाजपामध्ये असलेले मोहिते पाटील घराणे पुन्हा शरद पवारांसोबत आले. माढा येथे धैर्यशील पाटील हे खासदार झाले. 

राष्ट्रवादीचा पारंपारिक गड मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. २०१९ च्या विधानसभेत या भागातील ६७ विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीने ३७ जागा जिंकल्या होत्या, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील १२ जागांपैकी ८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रातील ६७ पैकी किमान ५० जागा जिंकण्याचं लक्ष शरद पवारांनी ठेवले आहे. आता त्यात किती यश मिळते हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४