शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:02 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांच्या पारंपारिक गडावर विशेष लक्ष केंद्रीत ठेवले आहे.

पुणे - इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश देत शरद पवारांनीभाजपासह पुतण्या अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवार स्वत: निवडणुकीची रणनीती आखत आहेत त्यातूनच कोल्हापूर, इंदापूर आणि येणाऱ्या काळात फलटणमध्येही पवार त्यांची खेळी खेळणार आहेत. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरातील माजी आमदार असून त्यांनी याआधी शिवसेना-भाजपा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही काळात मंत्रि‍पदे भूषावली आहेत. मात्र २०१४ आणि २०१९ यात अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केले. 

सध्या इंदापूरातील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. २०२४ मध्ये भरणे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी भाजपाला रामराम केला. साखरपट्टा भाग असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सहकार चळवळीतील नेते म्हणून भाजपाला हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्याने फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात कोल्हापूरात समरजितसिंह घाटगे यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

पक्ष सोडलेले अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मधुकर पिचड जे शरद पवारांचे निकटवर्तीय होते त्यांनी २०१४ साली भाजपात प्रवेश केला तेदेखील घरवापसीच्या तयारीत आहेत. पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी पराभूत केले. सध्या आमदार किरण लहामटे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे वैभव यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता अधिक आहे. मागील काही दिवसांपूर्वी पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याचेही पुढे आले.

महायुतीमुळे फक्त भाजपालाच नाही तर अजित पवारांनाही फटका बसताना दिसत आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढ्याचे बबन शिंदे हेदेखील तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील असं सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला मजबूत करण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यातूनच भाजपामध्ये असलेले मोहिते पाटील घराणे पुन्हा शरद पवारांसोबत आले. माढा येथे धैर्यशील पाटील हे खासदार झाले. 

राष्ट्रवादीचा पारंपारिक गड मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. २०१९ च्या विधानसभेत या भागातील ६७ विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीने ३७ जागा जिंकल्या होत्या, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील १२ जागांपैकी ८ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे येत्या विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रातील ६७ पैकी किमान ५० जागा जिंकण्याचं लक्ष शरद पवारांनी ठेवले आहे. आता त्यात किती यश मिळते हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४