शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:50 IST

ठाकरे गटाकडून यादी जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात झाली असून २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ आणि पक्षांतरे पाहायला मिळत आहेत. कोकणात रत्नागिरी येथे शिंदे गटाने उदय सामंत यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात ठाकरेंनी भाजपामधून आलेल्या नेत्याला संधी दिली आहे.

भाजपाचे माजी आमदार बाळा माने यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर बाळा माने यांना ठाकरेंकडून रत्नागिरी मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिला आहे. मातोश्रीबाहेर येताच माजी आमदार बाळा माने यांनी माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, निवडणूक म्हटलं तर लढाई असणार आहे. मागील ३५ वर्षापैकी ३० वर्ष शिवसेना आणि भाजपाची युती होती. परंतु आज काही राजकीय घडामोडी झाल्याने ही युती नाही. रत्नागिरी आमदार आणि मंत्रिपद असूनही मतदारसंघाचा विकास झाला नाही. सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला वेठीस धरून त्याठिकाणी कामकाज सुरू आहे. जनतेला परिवर्तन हवे. १९९० सालापासून उद्धव ठाकरे आणि आमचे संबंध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाचा विचार घेऊन मी काम करत होतो. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही पक्षात प्रवेश केला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच १९९९ ते २००४ शिवसेना भाजपा युती होती. तेव्हा अनंत गीते खासदार होते. त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. भाजपाने माझ्यावर कुठलाही अन्याय केला नाही. माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आहेत. परंतु रत्नागिरीत लोकांना बदल हवा. महायुती म्हणून भाजपाला ही जागा लढवता येत नसल्याने कुणाला निवडणूक लढता येत नाही. त्यातून जनतेची कोंडी झाली आहे. कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. बदल हा अटळ आहे. पुन्हा एकदा रत्नागिरीचं नेतृत्व करण्याची संधी जनता मला देईल हा विश्वास आहे असंही बाळा माने यांनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चिपळूण, राजापूर, रत्नागिरी याठिकाणी ५० हजारांचं मताधिक्य भाजपाला कमी मिळालं. महाविकास आघाडीला ४ महिन्यापूर्वी उद्धव ठाकरेंना मताधिक्य होते. याचा अर्थ ही पूर्वपरीक्षा झालेली आहे. विद्यार्थी नापास झालेला आहे त्यामुळे तो कितीही धनाढ्य असला तरी त्यांचा पराभव अटळ आहे असं सांगत बाळा माने यांनी उदय सामंत यांना टोला लगावला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीBJPभाजपाUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024