शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:25 IST

काँग्रेसचे नेते दिल्लीत मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यात बैठकींचा सिलसिला, पडद्यामागून काय चाललंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई - विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून महाविकास आघाडीत सातत्याने जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत. परंतु अद्याप जागावाटप जाहीर झालं नाही. त्यातच मविआतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र पुढे आले आहे. राज्यातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत असं विधान संजय राऊतांनी केले होते. तर उद्धव ठाकरेंपेक्षासंजय राऊत हे मोठे नेते असतील असा पलटवार काँग्रेसनं केला. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. अशावेळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांची तातडीने बैठक बोलावली होती. 

जवळपास २ तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय राऊत हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीला गेले. या भेटीला जायच्या आधी संजय राऊतांनी माध्यमांना म्हटलं की, सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. त्यात काँग्रेसचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत ज्या काही छोट्या मोठ्या चर्चा आहेत. त्या आज आम्ही पूर्ण करू. यशवंतराव चव्हाण सेंटरला आमची भेट होईल. तिथे आम्ही एकत्रित चर्चा करू. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील जे रखडलेले विषय आहेत ते संपवण्याचा आज प्रयत्न करू. मातोश्रीवरील बैठकीत आम्ही जे काही निर्णय घेतलेत, ते योग्य वेळी लवकरच जाहीर होतील असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय काँग्रेसला सोडून शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्र लढणार अशी चर्चा सुरू आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊतांनी सूचक भाष्य केले. माध्यमांनी बनवलेली ही स्टोरी आहे, ती तुमच्यापर्यंतच ठेवली पाहिजे. या स्टोरीला काय कंगोरे फुटतात का पाहा. लोकांना पाहायला मज्जा येते. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा का होऊ नये? महाविकास आघाडीच्या जवळपास १५ बैठका झाल्या आहेत. आम्ही ३४० तास चर्चा केलीय. पेच सुटेल असं भाष्य संजय राऊतांनी केले आहे. 

विदर्भातील १२ जागांवरून संघर्ष

महाविकास आघाडीत विदर्भातील १२ जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यात आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, अनिल परब यांनी शरद पवारांची भेट घेतली. काँग्रेस नेते दिल्लीत आहेत. लोकसभेला ठाकरे गटाने रामटेक आणि अमरावती ही जागा काँग्रेसला सोडली होती. त्या बदल्यात विधानसभेला विदर्भात काही जागा मिळतील अशी ठाकरे गटाची अपेक्षा होती. मात्र विदर्भातील १२ जागांवर ज्याठिकाणी विद्यमान मविआचे आमदार नाहीत या जागांवर दोन्ही पक्षातील तिढा वाढलेला आहे.

कोणत्या १२ जागांवरून वाद?

आरमोरी - कृष्णा गजबे, भाजपा आमदारगडचिरोली - देवराल होली, भाजपा आमदारगोंदिया - विनोद अग्रवाल, अपक्ष आमदारभंडारा - नरेंद्र भोंडेकर - अपक्ष आमदारचिमूर - किर्तीकुमार भांगडिया, भाजपा आमदारबल्लाळपूर - सुधीर मुनगंटीवार,भाजपा आमदारचंद्रपूर - किशोर जोरगेवार, अपक्ष आमदाररामटेक - आशिष जयस्वाल, अपक्ष आमदारकामठी - टेकचंद सावरकर, भाजपा आमदारदक्षिण नागपूर - मोहन माते, भाजपा आमदारअहेरी - धर्मरावबाबा आत्रम, अजित पवार गट आमदारभद्रावती वरोरा - प्रतिभा धानोरकर ज्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आल्यात. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस