शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 18:02 IST

Maharashtra Election 2019: पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती,

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार पावसात सभेला संबोधित केले. पवारांची साताऱ्यात मुसळधार पावसातील सभा देशभर चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालं. पण, उदयनराजे भोसलेंनी आपल्या प्रचाराच्या सांगता सभेतून पवारांच्या सभेचा आपल्या शब्दात समाचार घेतला. 

पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती, ती चूक दूरुस्त करण्याची वेळ आली असून घराघरातील तरुण वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना, साहेब चुकीची भाषा बोलतायंत, तर आता आमचंही ऐका, असे म्हणत उदयनराजेंही पवारांवर बरसले. चूक तुम्ही नाही, निवडणुकीत चूक आम्ही अन् जनतेनं केली. आमच्या सांगण्यावरुन, विनंत्यावरुन तुम्हाला मत दिली ही आमची चूक होती का? लोकसभेला चौघे निवडणूक आले अन् उर्वरीत जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले ही आमचीच चूक होती का?. गेल्या 50 वर्षांच्या राजकारणात भगव्या झेंड्याची आठवण आत्ताच कशी आली? सिंचनापासून महाराष्ट्र वंचित ठेवला, ही आमचीच चूक होती का?. पवारसाहेब, तुमचा पुतण्या *** ची (धरणातील विधानावरुन) भाषा करतो अन् तुम्ही सावरुन घेता ही आमची चूक होती का?. दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला तुम्ही तोंडाला पाने पुसली ही आमची चूक आहे का?. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार केवळ 1 मताने पाडले अन् देशाला लाखो कोटी रुपयांचा भुर्दंड बसला ही आमची चूक होती का?

मराठा आरक्षणासाठी समाजाची 50 वर्षे फरफट केली, ही आमची चूक होती का? राज्य शिखर बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला ही आमची चूक होती का?. कलम 370 ला तुम्ही विरोध केला आणि शहीद कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळलं ही आमची चूक होती का? असे म्हणत उदयनराजेंनी पवारांना लक्ष्य केलं. आम्ही कौरवांच्या टोळीतून बाहेर पडलो अऩ् पांडवांच्या सोबत उभे राहिलो, तुम्ही उभारणार असाल तर मी निवडणूक लढवणार नाही, आम्ही ज्येष्ठांचा आदर करतो? ही आमची चूक आहे का?. पडलेला पाऊस हा शुभ शकून नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घाण धुवून टाकण्याची सुरूवात झाल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय. साताऱ्यातील सभा म्हणजे जनतेला काळू-बाळूचा तमाशा वाटला. या तमाशात ढगाला लागली कळ, काँग्रेस राष्ट्रवादीची मत गळ. आणि धनुष्यबाण-कमळाची मतं फुलं, असंच म्हणाव लागेल, असे उदयनराजेंनी म्हटलं. उदयनराजेंनी कागदावर भाषण लिहून आणलं होतं, ते भाषण वाचून दाखवताना पवारांना ती माझी चूक आहे का? असा प्रतिप्रश्न पवारांना केलाय.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019