शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

Maharashtra Election 2019: 'तुमचा पुतण्या *** ची भाषा करतो, मग ही चूक आमची का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 18:02 IST

Maharashtra Election 2019: पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती,

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार पावसात सभेला संबोधित केले. पवारांची साताऱ्यात मुसळधार पावसातील सभा देशभर चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे सोशल मीडियावर वातावरण पवारमय झालं. पण, उदयनराजे भोसलेंनी आपल्या प्रचाराच्या सांगता सभेतून पवारांच्या सभेचा आपल्या शब्दात समाचार घेतला. 

पवारांनी साताऱ्यातील सभेत बोलताना मी लोकसभा निवडणुकांवेळी चूक केली होती, ती चूक दूरुस्त करण्याची वेळ आली असून घराघरातील तरुण वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना, साहेब चुकीची भाषा बोलतायंत, तर आता आमचंही ऐका, असे म्हणत उदयनराजेंही पवारांवर बरसले. चूक तुम्ही नाही, निवडणुकीत चूक आम्ही अन् जनतेनं केली. आमच्या सांगण्यावरुन, विनंत्यावरुन तुम्हाला मत दिली ही आमची चूक होती का? लोकसभेला चौघे निवडणूक आले अन् उर्वरीत जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले ही आमचीच चूक होती का?. गेल्या 50 वर्षांच्या राजकारणात भगव्या झेंड्याची आठवण आत्ताच कशी आली? सिंचनापासून महाराष्ट्र वंचित ठेवला, ही आमचीच चूक होती का?. पवारसाहेब, तुमचा पुतण्या *** ची (धरणातील विधानावरुन) भाषा करतो अन् तुम्ही सावरुन घेता ही आमची चूक होती का?. दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला तुम्ही तोंडाला पाने पुसली ही आमची चूक आहे का?. अटलबिहारी वाजपेयींचं सरकार केवळ 1 मताने पाडले अन् देशाला लाखो कोटी रुपयांचा भुर्दंड बसला ही आमची चूक होती का?

मराठा आरक्षणासाठी समाजाची 50 वर्षे फरफट केली, ही आमची चूक होती का? राज्य शिखर बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला ही आमची चूक होती का?. कलम 370 ला तुम्ही विरोध केला आणि शहीद कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळलं ही आमची चूक होती का? असे म्हणत उदयनराजेंनी पवारांना लक्ष्य केलं. आम्ही कौरवांच्या टोळीतून बाहेर पडलो अऩ् पांडवांच्या सोबत उभे राहिलो, तुम्ही उभारणार असाल तर मी निवडणूक लढवणार नाही, आम्ही ज्येष्ठांचा आदर करतो? ही आमची चूक आहे का?. पडलेला पाऊस हा शुभ शकून नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घाण धुवून टाकण्याची सुरूवात झाल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय. साताऱ्यातील सभा म्हणजे जनतेला काळू-बाळूचा तमाशा वाटला. या तमाशात ढगाला लागली कळ, काँग्रेस राष्ट्रवादीची मत गळ. आणि धनुष्यबाण-कमळाची मतं फुलं, असंच म्हणाव लागेल, असे उदयनराजेंनी म्हटलं. उदयनराजेंनी कागदावर भाषण लिहून आणलं होतं, ते भाषण वाचून दाखवताना पवारांना ती माझी चूक आहे का? असा प्रतिप्रश्न पवारांना केलाय.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019