शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Maharashtra Election 2019: 'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 09:46 IST

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - सगळ्या पक्षांशी बांधिलकी जनतेशी आहे. सत्तेत राहून विरोध करणे हा शिवसेनेचा नवीन पॅटर्न आहे. याचं स्वागत व्हायला हवं. पूर्वी तसं होत असे सरकारने सरकारचं काम करायचं आणि विरोधकांनी विरोधाचं काम करायचं. आमची भूमिका भाजपाला मान्य आहे म्हणून भाजपाने शिवसेनेसोबत युती केली असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मांडले आहे. 

एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सुभाष देसाई म्हणाले की,महाराष्ट्राच्या राजकारणात दोनच राजकीय पक्ष भाजपा-शिवसेना आहेत. बाकी कुठेही दिसत नाही. आम्ही सरकारवर टीका केली नाही तर जनतेच्या बाजूने राहिलो आहे. अनेक आंदोलनात शिवसेना सहभागी झाली. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच राणे प्रवृत्तीला शिवसेनेचा विरोध आहे. कणकवलीची जागा भाजपाची आहे, भाजपाचा कोणीही उमेदवार दिला असता तरी विरोध केला नसता. मात्र राणे ही प्रवृत्ती आहे तिला शिवसेनेचा कायम विरोध राहणार आहे. आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करायला ते निवडून आले पाहिजेत. कणकवलीत शिवसेना विजयी होणार आहे. राणेंच्या विरोधात आम्ही उमेदवार दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. हा वाद भाजपाशी नाही तर राणे प्रवृत्तीशी आहे अशी भूमिका सुभाष देसाईंनी मांडली. 

दरम्यान, आरेचा विषय वचननाम्यात नाही कारण हा विषय पुढे गेलेला आहे. आरे जंगल घोषित करणार हे आदित्य ठाकरेंनी घोषित केलं आहे. आरेच्या बाजूने आम्ही मनापासून आहोत. रात्रीच्या अंधारात वृक्षतोड केली गेली. सुप्रीम कोर्टात निर्णय असल्याने निर्णयाची वाट बघावी लागेल. जेव्हा न्यायहक्काचे प्रश्न आहे, जनतेचे प्रश्न चिरडले जाईल तेव्हा शिवसेना जनतेसोबत राहील. आम्ही कधीही विरोधाला विरोध केला नाही म्हणून सरकार स्थिर राहिलं. आज जी विकासकामे झाली त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असंही सुभाष देसाईंनी सांगितले.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019