शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

Maharashtra Election 2019: 'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 09:46 IST

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - सगळ्या पक्षांशी बांधिलकी जनतेशी आहे. सत्तेत राहून विरोध करणे हा शिवसेनेचा नवीन पॅटर्न आहे. याचं स्वागत व्हायला हवं. पूर्वी तसं होत असे सरकारने सरकारचं काम करायचं आणि विरोधकांनी विरोधाचं काम करायचं. आमची भूमिका भाजपाला मान्य आहे म्हणून भाजपाने शिवसेनेसोबत युती केली असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मांडले आहे. 

एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सुभाष देसाई म्हणाले की,महाराष्ट्राच्या राजकारणात दोनच राजकीय पक्ष भाजपा-शिवसेना आहेत. बाकी कुठेही दिसत नाही. आम्ही सरकारवर टीका केली नाही तर जनतेच्या बाजूने राहिलो आहे. अनेक आंदोलनात शिवसेना सहभागी झाली. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच राणे प्रवृत्तीला शिवसेनेचा विरोध आहे. कणकवलीची जागा भाजपाची आहे, भाजपाचा कोणीही उमेदवार दिला असता तरी विरोध केला नसता. मात्र राणे ही प्रवृत्ती आहे तिला शिवसेनेचा कायम विरोध राहणार आहे. आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करायला ते निवडून आले पाहिजेत. कणकवलीत शिवसेना विजयी होणार आहे. राणेंच्या विरोधात आम्ही उमेदवार दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. हा वाद भाजपाशी नाही तर राणे प्रवृत्तीशी आहे अशी भूमिका सुभाष देसाईंनी मांडली. 

दरम्यान, आरेचा विषय वचननाम्यात नाही कारण हा विषय पुढे गेलेला आहे. आरे जंगल घोषित करणार हे आदित्य ठाकरेंनी घोषित केलं आहे. आरेच्या बाजूने आम्ही मनापासून आहोत. रात्रीच्या अंधारात वृक्षतोड केली गेली. सुप्रीम कोर्टात निर्णय असल्याने निर्णयाची वाट बघावी लागेल. जेव्हा न्यायहक्काचे प्रश्न आहे, जनतेचे प्रश्न चिरडले जाईल तेव्हा शिवसेना जनतेसोबत राहील. आम्ही कधीही विरोधाला विरोध केला नाही म्हणून सरकार स्थिर राहिलं. आज जी विकासकामे झाली त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असंही सुभाष देसाईंनी सांगितले.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019