शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 09:46 IST

अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - सगळ्या पक्षांशी बांधिलकी जनतेशी आहे. सत्तेत राहून विरोध करणे हा शिवसेनेचा नवीन पॅटर्न आहे. याचं स्वागत व्हायला हवं. पूर्वी तसं होत असे सरकारने सरकारचं काम करायचं आणि विरोधकांनी विरोधाचं काम करायचं. आमची भूमिका भाजपाला मान्य आहे म्हणून भाजपाने शिवसेनेसोबत युती केली असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मांडले आहे. 

एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सुभाष देसाई म्हणाले की,महाराष्ट्राच्या राजकारणात दोनच राजकीय पक्ष भाजपा-शिवसेना आहेत. बाकी कुठेही दिसत नाही. आम्ही सरकारवर टीका केली नाही तर जनतेच्या बाजूने राहिलो आहे. अनेक आंदोलनात शिवसेना सहभागी झाली. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच राणे प्रवृत्तीला शिवसेनेचा विरोध आहे. कणकवलीची जागा भाजपाची आहे, भाजपाचा कोणीही उमेदवार दिला असता तरी विरोध केला नसता. मात्र राणे ही प्रवृत्ती आहे तिला शिवसेनेचा कायम विरोध राहणार आहे. आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करायला ते निवडून आले पाहिजेत. कणकवलीत शिवसेना विजयी होणार आहे. राणेंच्या विरोधात आम्ही उमेदवार दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. हा वाद भाजपाशी नाही तर राणे प्रवृत्तीशी आहे अशी भूमिका सुभाष देसाईंनी मांडली. 

दरम्यान, आरेचा विषय वचननाम्यात नाही कारण हा विषय पुढे गेलेला आहे. आरे जंगल घोषित करणार हे आदित्य ठाकरेंनी घोषित केलं आहे. आरेच्या बाजूने आम्ही मनापासून आहोत. रात्रीच्या अंधारात वृक्षतोड केली गेली. सुप्रीम कोर्टात निर्णय असल्याने निर्णयाची वाट बघावी लागेल. जेव्हा न्यायहक्काचे प्रश्न आहे, जनतेचे प्रश्न चिरडले जाईल तेव्हा शिवसेना जनतेसोबत राहील. आम्ही कधीही विरोधाला विरोध केला नाही म्हणून सरकार स्थिर राहिलं. आज जी विकासकामे झाली त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असंही सुभाष देसाईंनी सांगितले.   

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019