शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

शरद पवार हिंदू, अशोक चव्हाणही हिंदू; आम्ही काय धर्मांतर केलंय का?; 'हिंदुत्वा'वर शिवसेना 'सॉफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:14 IST

कुणाबरोबर जाण्यापेक्षा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणं महत्त्वाचं आहे.

ठळक मुद्देशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सकारात्मक दिसत आहेत.शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय करणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना?

मुंबईः राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी गेल्या दोन दिवसांपासून सत्तास्थापनेच्या हालचालींना आलेला वेग कमी झालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तीन पक्षांमध्ये सत्तावाटपाचं सूत्र आणि किमान समान कार्यक्रम ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळातही, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय करणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला आपल्या शैलीत उत्तर दिलंय. लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. 

'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन

भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्व आड येणार नाही का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही काय धर्मांतर केलं आहे का? सगळेच हिंदू आहेत. शरद पवार हिंदू आहेत, अशोक चव्हाण हिंदू आहेत. प्रत्येक पक्षाच्या विचारधारेत थोडेफार मतभेद असतातच. प्रत्येक गोष्ट पटतेच असं नाही. भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना?, असंही त्यांनी नमूद केलं. त्यातून, शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायची मानसिक तयारी स्पष्ट दिसते आहेच, पण येत्या काळात ते 'सॉफ्ट हिंदुत्वा'ची कास धरू शकतात, असंही सूचित होतंय. 

शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास?

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार 

कुणाबरोबर जाण्यापेक्षा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणं महत्त्वाचं आहे. भाजपाने शब्द देऊन पाळला नाही. महाराष्ट्रात दिलेल्या शब्दाला फार किंमत असते. अयोध्येत राम मंदिर बांधतोय, मग सत्यवचनी रामाचा विचारही घ्या, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आमच्याकडे १७० आमदार आहेत आणि ते कसे येणार हे शरद पवारांना माहीत आहे, असंही त्यांनी सूचित केलं. राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणाऱ्या राज्यपालांनी सर्वच पक्षांवर अन्याय केला आहे, मुख्यमंत्री आमचाच होईल असं म्हणणाऱ्या आणि १५ दिवसांनी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपाचे कान राज्यपालांनी धरायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.  

छातीत दुखू लागल्यानं संजय राऊत यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आल्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019President Ruleराष्ट्रपती राजवटSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार