शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

शरद पवार हिंदू, अशोक चव्हाणही हिंदू; आम्ही काय धर्मांतर केलंय का?; 'हिंदुत्वा'वर शिवसेना 'सॉफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:14 IST

कुणाबरोबर जाण्यापेक्षा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणं महत्त्वाचं आहे.

ठळक मुद्देशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सकारात्मक दिसत आहेत.शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय करणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना?

मुंबईः राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी गेल्या दोन दिवसांपासून सत्तास्थापनेच्या हालचालींना आलेला वेग कमी झालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तीन पक्षांमध्ये सत्तावाटपाचं सूत्र आणि किमान समान कार्यक्रम ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळातही, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय करणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला आपल्या शैलीत उत्तर दिलंय. लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. 

'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन

भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्व आड येणार नाही का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही काय धर्मांतर केलं आहे का? सगळेच हिंदू आहेत. शरद पवार हिंदू आहेत, अशोक चव्हाण हिंदू आहेत. प्रत्येक पक्षाच्या विचारधारेत थोडेफार मतभेद असतातच. प्रत्येक गोष्ट पटतेच असं नाही. भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना?, असंही त्यांनी नमूद केलं. त्यातून, शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायची मानसिक तयारी स्पष्ट दिसते आहेच, पण येत्या काळात ते 'सॉफ्ट हिंदुत्वा'ची कास धरू शकतात, असंही सूचित होतंय. 

शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास?

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार 

कुणाबरोबर जाण्यापेक्षा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणं महत्त्वाचं आहे. भाजपाने शब्द देऊन पाळला नाही. महाराष्ट्रात दिलेल्या शब्दाला फार किंमत असते. अयोध्येत राम मंदिर बांधतोय, मग सत्यवचनी रामाचा विचारही घ्या, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आमच्याकडे १७० आमदार आहेत आणि ते कसे येणार हे शरद पवारांना माहीत आहे, असंही त्यांनी सूचित केलं. राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणाऱ्या राज्यपालांनी सर्वच पक्षांवर अन्याय केला आहे, मुख्यमंत्री आमचाच होईल असं म्हणणाऱ्या आणि १५ दिवसांनी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपाचे कान राज्यपालांनी धरायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.  

छातीत दुखू लागल्यानं संजय राऊत यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आल्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019President Ruleराष्ट्रपती राजवटSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार