शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शरद पवार हिंदू, अशोक चव्हाणही हिंदू; आम्ही काय धर्मांतर केलंय का?; 'हिंदुत्वा'वर शिवसेना 'सॉफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 14:14 IST

कुणाबरोबर जाण्यापेक्षा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणं महत्त्वाचं आहे.

ठळक मुद्देशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सकारात्मक दिसत आहेत.शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय करणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना?

मुंबईः राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी गेल्या दोन दिवसांपासून सत्तास्थापनेच्या हालचालींना आलेला वेग कमी झालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तीन पक्षांमध्ये सत्तावाटपाचं सूत्र आणि किमान समान कार्यक्रम ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळातही, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय करणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला आपल्या शैलीत उत्तर दिलंय. लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. 

'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन

भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्व आड येणार नाही का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही काय धर्मांतर केलं आहे का? सगळेच हिंदू आहेत. शरद पवार हिंदू आहेत, अशोक चव्हाण हिंदू आहेत. प्रत्येक पक्षाच्या विचारधारेत थोडेफार मतभेद असतातच. प्रत्येक गोष्ट पटतेच असं नाही. भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना?, असंही त्यांनी नमूद केलं. त्यातून, शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायची मानसिक तयारी स्पष्ट दिसते आहेच, पण येत्या काळात ते 'सॉफ्ट हिंदुत्वा'ची कास धरू शकतात, असंही सूचित होतंय. 

शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास?

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार 

कुणाबरोबर जाण्यापेक्षा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणं महत्त्वाचं आहे. भाजपाने शब्द देऊन पाळला नाही. महाराष्ट्रात दिलेल्या शब्दाला फार किंमत असते. अयोध्येत राम मंदिर बांधतोय, मग सत्यवचनी रामाचा विचारही घ्या, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आमच्याकडे १७० आमदार आहेत आणि ते कसे येणार हे शरद पवारांना माहीत आहे, असंही त्यांनी सूचित केलं. राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणाऱ्या राज्यपालांनी सर्वच पक्षांवर अन्याय केला आहे, मुख्यमंत्री आमचाच होईल असं म्हणणाऱ्या आणि १५ दिवसांनी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपाचे कान राज्यपालांनी धरायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.  

छातीत दुखू लागल्यानं संजय राऊत यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आल्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019President Ruleराष्ट्रपती राजवटSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार