शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

महाराष्ट्र निवडणूक 2019: शेवटच्या तासापर्यंत मी आशावादी; शरद पवारांना सत्तास्थापनेची खात्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 1:46 PM

शिवसेना सोबत न आल्यास स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे....

ठळक मुद्दे९ तारखेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट लागू शकते.'भाजपा-सेना आज ना उद्या एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील याची आम्हाला खात्री वाटते'शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुठलंही प्रपोजल आणलं नव्हतंः शरद पवार

महाराष्ट्रात भाजपा - शिवसेना महायुतीकडे बहुमताचा आकडा असला, तरी त्यांच्यात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून एकमत होत नसल्यानं सत्तास्थापनेची कोंडी फुटता फुटत नाहीए. ९ तारखेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास विधानसभा विसर्जित होऊन राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे सगळेच पक्ष वेगाने हातपाय मारताना दिसत आहेत. शिवसेना सोबत न आल्यास स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये भेटीगाठी, फोनाफोनी सुरू असल्याचंही समजतंय. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आहे. सातत्याने विरोधी पक्षात बसण्याची भूमिका पवार मांडत असले, तरी सस्पेन्स कायम ठेवण्याचं कामही ते चोख बजावताहेत. आजच्या पत्रकार परिषदेतही, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही, असं म्हणतानाच ते बरंच काही बोलून गेले.

...अन् अखेर शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, चर्चेचे चक्र फिरले; उद्धव ठाकरेंना मानाचं पद?

शरद पवार म्हणतात, तुमच्याप्रमाणे मीदेखील त्यांची आतुरतेनं वाट पाहतोय

राज्यातील जनतेनं भाजपा-शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यांची युती आजची नाही. २५ वर्षांपासून ते सोबत आहेत. त्यामुळे ते आज ना उद्या एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील याची आम्हाला खात्री वाटते, असं शरद पवार यांनी पुन्हा स्पष्ट केलं. आता अवघे काही तास उरले आहेत आणि भाजपा-शिवसेनेतील तिढा सुटताना दिसत नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, या प्रश्नावरही त्यांनी युतीच्या एकीचा आशावाद व्यक्त केला. त्यांचं जमेल असा विश्वास मला अगदी शेवटच्या तासापर्यंत आहे, असं त्यांनी नमूद केलं. 

२५ वर्षं युतीत सडली म्हणाले, पण एकत्रच निवडणूक लढले; शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास काही दिवसांत पुन्हा निवडणुका होतील'

राज्याच्या सत्तास्थापनेत माझी कुठलीही भूमिका नाही, पुढचे तीन दिवस तर मी मुंबईतही नाही, असं शरद पवार म्हणाले खरं; पण निर्णय घ्यायचा झालाच, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच घेतील, असंही त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कुठलंही प्रपोजल आणलं नव्हतं, ते नेहमीच भेटतात आणि आमची भेट सकारात्मकच होते, राज्यसभेच्या विषयासंदर्भात ते आले होते, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपा-शिवसेनेनं घटनात्मक पेच निर्माण होऊ देऊ नये, त्यांच्याकडे संख्या आहे, त्यांनी सरकार बनवावं. आमच्याकडे संख्या असती तर आम्हीच बनवलं असतं, वाट पाहिली नसती, असा सल्लाही त्यांनी दिला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस