शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

'नाय, नो, नेव्हर'... अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर भाजपाला शिवसेनेविरोधात नवी 'पॉवर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 15:13 IST

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेली आहे का, मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का, असं चित्र निर्माण झालं होतं. पण...

ठळक मुद्देज्या महायुतीला जनतेनं बहुमताचा कौल दिला, त्यातलेच दोन भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.'पदं आणि जबाबदाऱ्या यामध्ये मुख्यमंत्रिपद येत नाही, मुख्यमंत्रीपदावर तडजोड होणार नाही!'

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची कोंडी कधी फुटणार, भाजपा आणि शिवसेनेचं सूत कधी जुळणार की नवंच राजकीय समीकरण पाहायला मिळणार, या प्रश्नांची उत्तरं निकालाला दहा दिवस होऊनही मिळायला तयार नाहीत. कारण, ज्या महायुतीला जनतेनं बहुमताचा कौल दिला, त्यातलेच दोन भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी सोडायला तयार नाही आणि असं काही ठरलंच नव्हतं, या भूमिकेवर भाजपा ठाम आहे. त्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत भाजपावर रोज नवे 'बाण' सोडत आहेत. त्याला भाजपा नेतृत्वाकडून प्रत्युत्तर दिलं जात नसल्यानं,  ते 'बॅकफूट'वर गेलेत की काय, देवेंद्र फडणवीस एकटे पडले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर चित्र बदललं आहे आणि भाजपा 'फ्रंटफूट'वर खेळू लागल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्रिपद देणार नाही म्हणजे नाही, असंच अमित शहा - फडणवीस बैठकीत पक्कं झाल्याचं सूत्रांकडून समजतं. त्यामुळे आता शिवसेनेवरचा दबाव वाढणार आहे.

सरकार नक्की स्थापन होईल असं मुख्यमंत्री म्हणाले; पण 'मुद्द्याचं' नाही बोलले!

संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण...

विधानसभा निवडणूक निकालानंतर पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या घोषणेवेळी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याचाच आधार घेत, शिवसेना अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद मागतेय. परंतु, पदं आणि जबाबदाऱ्या यामध्ये मुख्यमंत्रिपद येत नाही आणि मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटपाचा शब्द आपण शिवसेनेला दिलेला नाही, यावर आज शाह-फडणवीस भेटीतही शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतं. म्हणजेच, भाजपा 'नाय नो नेव्हर'वर शत प्रतिशत ठाम आहे आणि चेंडू पुन्हा सेनेच्या कोर्टात गेला आहे. 

'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

'इथं माझंच मला पडलंय अन् तुम्ही मलाच विचारा, सरकार कुणाचं येणार'- उदयनराजे

महाराष्ट्रात नवं सरकार नक्की स्थापन होईल आणि आम्ही त्याबाबत आश्वस्त आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर आत्मविश्वासाने सांगितलं. त्यात त्यांनी ना शिवसेनेचा उल्लेख केला, ना महायुतीचा. सरकार स्थापनेबाबत अनेक जण बोलत आहेत, पण भाजपाचे नेते काही बोलणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेला अवाजवी महत्त्व न देण्याचा किंवा अनुल्लेखाने मारण्याचा भाजपाचा फंडा असल्याचं दिसतंय.   

शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; आमदाराचा खळबळजनक दावा

'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

भाजपा आपल्या मदतीशिवाय सरकार स्थापन करू शकत नाही, असा निकाल लागल्यानं शिवसेनेनं आपली मागणी मुख्यमंत्रिपदाची लावून धरलीय. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याचं ठरलं नव्हतं, मुख्यमंत्रिपदावर तडजोड होऊच शकत नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीदरम्यान स्पष्ट केली. तेव्हापासून दोन भाऊ एकमेकांची तोंडंही पाहायला तयार नाहीत. युतीतील चर्चा ठप्प असली, तरी संजय राऊत एकदम फॉर्मात आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवतीर्थावर शपथ घेणार, १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, राज्यपालांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांचा चेहरा थकल्यासारखा वाटतोय, लोकसभेवेळी जे ठरलं होतं ते मान्य करा, अशा डरकाळ्या ते रोज फोडत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेऊन, अजित पवारांना मेसेज पाठवून ते भाजपावर दबाव वाढवताना दिसताहेत. त्यावर भाजपानं कुठलीही प्रतिक्रिया न देणं, हे ठरवून केलं जात असल्याचंच आज स्पष्ट झालं आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा