शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 13:29 IST

निकालानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात,

मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल काही तासात लागणार आहे. राज्यभरात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचे अंदाज वर्तविले जात आहे. भाजपा-शिवसेनेला पुन्हा एकदा बहुमत मिळणार असल्याचं चित्र एक्झिट पोलवरुन दिसत आहे. मात्र यामध्ये भाजपाला किती जागा मिळणार आणि शिवसेना किती जागांवर विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

मात्र तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत देताना केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. निकालानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात, राजकारण काय काय होऊ शकते? काहीही अशक्य नाही असा सूचक इशारा काँग्रेसने भाजपाला दिला आहे. 

एक्झिट पोल प्रमाणे शिवसेनेला जर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला व यांना काँग्रेसने बाहेरून पाठींबा दिला तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात व "मी पुन्हा येईन" म्हणून सांगणारे घरी बसू शकतात. युद्धात, प्रेमात सर्व माफ असतं असं सांगत एकप्रकारे शिवसेनेला बळ देण्याचा निर्णय राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी घेऊ शकते असं सूचक विधान केलं आहे. 

दरम्यान, भाजपाला स्वबळावर बहुमत मिळाल्यास शिवसेनेला सत्तेत वाटा देणार नाही अशी चर्चा आहे त्यावर तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना हे प्रत्येक पक्षाला लागू होतं.  सत्ता म्हणजे सर्वोच्च नाही, उद्याचे निकाल लागल्यावर शिवसेना काय आहे हे कळेल. राज्यातील जनता सुज्ञ आहे, युतीत आम्ही निवडणुका लढलो आहे तर सत्तेतही एकत्र राहणार आहे. शिवसेना १०० जागांवर विजयी होणार आहे. भाजपाला जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

तर उद्धव ठाकरे हेदेखील शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार असल्याची घोषणा केली होती. एक्झिट पोलच्या निकालानुसार काही ठिकाणी शिवसेनेला १०० वर जागा जिंकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. असं घडल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा १४५ गाठणं शिवसेनेसाठी कठीण होणार नाही. तर भाजपाला स्वबळावर बहुमतासाठी १४५ जागा मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला किती जागा मिळणार यावर राज्याचं पुढचं राजकारण तयार होणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाAaditya Thackerayआदित्य ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस