शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 13:03 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं.

ठळक मुद्देशरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली 'वादळी सभा' देशभरात डोक्यावर घेतली जातेय. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात फडणवीस आणि पवारांमध्ये कुस्तीवरून बरीच शाब्दिक चकमक रंगली होती.

मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, भाजपा-शिवसेना महायुतीने बहुमत मिळवलं असलं, तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीच. वयाच्या ७९व्या वर्षी राज्यभर फिरून त्यांनी केलेला झंझावाती प्रचार आणि साताऱ्यात भर पावसात घेतलेली 'वादळी सभा' देशभरात डोक्यावर घेतली जातेय. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना अप्रत्यक्षपणे टोला मारला. 

शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं. तोच धागा पकडत, 'पावसात भिजावे लागते हा आमचा अनुभव कमी पडला', अशी मार्मिक टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. 'वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राजकारणावरील बऱ्याच प्रश्नांना उत्तरं दिली. कुणी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणू देत, कुणी 'मॅन ऑफ द सीरीज' म्हणू देत, पण सरकार कुणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा

दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात फडणवीस आणि पवारांमध्ये कुस्तीवरून बरीच शाब्दिक चकमक रंगली होती. आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. तेव्हा, मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष असल्याचं प्रत्युत्तर पवारांनी दिलं होतं. अखेर, या स्पर्धेत कुठला पैलवान जिंकला, असं विचारताच, त्यांचे ५४ आलेत आणि माझे १०५ आलेत, याकडे मुख्यमंत्र्यांनी विजयी आविर्भावात लक्ष वेधलं.

'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार!

जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच!

आम्ही शिवसेनेसोबतच सरकार स्थापन करू, असं ठामपणे सांगतानाच, मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलाही समझौता होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं. अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं दिला होता, पण त्यावर कुठलाही निर्णय झाला नव्हता, असं सांगून त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेला सत्तावाटपात फार तर उपमुख्यमंत्रिपद आणि दोन-तीन महत्त्वाची खाती द्यावीत अशा मानसिकतेत भाजपाचे केंद्रीय नेतृत्व असल्याचं समजतं. 

अर्थात, भाजपाच्या नेतानिवडीच्या आजच्या बैठकीनंतर, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा होईल. त्यात पुढचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल. आता शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसणार की तडजोड करणार, याबद्दल उत्सुकता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाShiv Senaशिवसेना