शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 13:03 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं.

ठळक मुद्देशरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली 'वादळी सभा' देशभरात डोक्यावर घेतली जातेय. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात फडणवीस आणि पवारांमध्ये कुस्तीवरून बरीच शाब्दिक चकमक रंगली होती.

मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, भाजपा-शिवसेना महायुतीने बहुमत मिळवलं असलं, तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीच. वयाच्या ७९व्या वर्षी राज्यभर फिरून त्यांनी केलेला झंझावाती प्रचार आणि साताऱ्यात भर पावसात घेतलेली 'वादळी सभा' देशभरात डोक्यावर घेतली जातेय. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना अप्रत्यक्षपणे टोला मारला. 

शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं. तोच धागा पकडत, 'पावसात भिजावे लागते हा आमचा अनुभव कमी पडला', अशी मार्मिक टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. 'वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राजकारणावरील बऱ्याच प्रश्नांना उत्तरं दिली. कुणी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणू देत, कुणी 'मॅन ऑफ द सीरीज' म्हणू देत, पण सरकार कुणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा

दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात फडणवीस आणि पवारांमध्ये कुस्तीवरून बरीच शाब्दिक चकमक रंगली होती. आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. तेव्हा, मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष असल्याचं प्रत्युत्तर पवारांनी दिलं होतं. अखेर, या स्पर्धेत कुठला पैलवान जिंकला, असं विचारताच, त्यांचे ५४ आलेत आणि माझे १०५ आलेत, याकडे मुख्यमंत्र्यांनी विजयी आविर्भावात लक्ष वेधलं.

'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार!

जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच!

आम्ही शिवसेनेसोबतच सरकार स्थापन करू, असं ठामपणे सांगतानाच, मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलाही समझौता होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं. अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं दिला होता, पण त्यावर कुठलाही निर्णय झाला नव्हता, असं सांगून त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेला सत्तावाटपात फार तर उपमुख्यमंत्रिपद आणि दोन-तीन महत्त्वाची खाती द्यावीत अशा मानसिकतेत भाजपाचे केंद्रीय नेतृत्व असल्याचं समजतं. 

अर्थात, भाजपाच्या नेतानिवडीच्या आजच्या बैठकीनंतर, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा होईल. त्यात पुढचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल. आता शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसणार की तडजोड करणार, याबद्दल उत्सुकता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाShiv Senaशिवसेना